शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघात विमा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ‘झटका’

By admin | Updated: February 28, 2015 01:06 IST

टॅ्रक्टर अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा विमा दावा दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने फेटाळला.

गोंदिया : टॅ्रक्टर अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा विमा दावा दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने फेटाळला. त्यावर सदर शेतकऱ्याच्या पत्नीने ग्राहक न्यायमंचात धाव घेवून आपल्या हक्काची विमा रक्कम एक लाख रूपये व नुकसानभरपाई मिळवून घेतली. पुष्पा लालचंद कावरे रा. बुद्धुटोला (ता. व जि. गोंदिया) असे तक्रारकर्तीचे नाव आहे. तिचे पती लालचंद प्रेमलाल कावरे यांच्या मालकीची बुद्धुटोला येते ०.२० हेक्टरे शेतजमीन आहे. १४ जून २०१० रोजी लालचंद यांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला व भादंविच्या कलम २७९,३३७, ३०४ अ नुसार रावणवाडी पोलीस ठाण्यात नमूद आहे. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने पुष्पाने संपूर्ण कागदपत्रांसह ६ डिसेंबर २०१० रोजी दि युनायटेड इन्शुरंस कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा अर्ज केला. परंतु तो फेटाळला गेला. तिने पुन्हा अ‍ॅड. सी.जे गजभिये यांच्या मार्फत अर्ज केला. परंतु विमा कंपनीने कसलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तिने १७ आॅक्टोबर २०१४ रोजी ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली. यानंतर मंचामार्फत नोटीस विरूद्ध पक्षांना पाठविण्यात आल्या. विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात, लालचंद कावरे यांचा मृत्यू १४ जून २०१० रोजी झाला. या दाव्याचा विमा कालावधी १५ आॅगस्ट २००९ ते १४ आॅगस्ट २०१० असून ९० दिवसांचा वाढीव कालावधी म्हणजे १४ नोव्हेंबर २०१० होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमार्फत कबाल नागपूर कार्यालयास ६ आॅगस्ट २०११ रोजी म्हणजे पॉलिसी संपल्यावर एक वर्षाने प्राप्त झाला. तो प्रस्ताव कबाल नागपूर मार्फत युनायटेड इंडिया विमा कंपनीला ८ आॅगस्ट २०११ रोजी पाठविण्यात आला. मात्र सदर दावा नामंजूर केल्याचे १७ एप्रिल २०१२ रोजी पत्रान्वये कळविले, असे जबाबात म्हटले.मात्र तक्रारकर्ती पुष्पा कावरेने सर्वच कागदपत्रे तक्रारीसोबत दाखल केली होती. तसेच वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायमंचाने कारणमिमांसा केली.पुष्पाची त्यावेळची मानसिक स्थिती, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लागलेला वेळ व कुटुंबातील एकमेव सज्ञान व्यक्ती या बाबींचा विचार करून न्यायमंचाने विमा दावा दाखल करण्यासाठी लागलेला विलंब संयुक्तिक कारण ठरविले. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार ९० दिवसानंतरही दावा दाखल केला जावू शकतो व मंजूर होण्यास पात्रही असतो. तिने दाखल केलेले पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, एफआयआर, पंचनामा यावरून अपघाती मृत्यू सिद्ध होते. शिवाय तिने अर्ज करून व व्ययक्तिकरित्या विचारणा करूनही कंपनी व कंपनीच्या ब्रोकरने टाळाटाळ करून मानसिक त्रास देवून परत पाठविले. त्यामुळेच विमा दावा प्रलंबित असल्याचे मंचाच्या निदर्शनास आले. ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने सदर तक्रार अंशत: मान्य केली. मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये विमा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दि युनायटेड इंडिया इन्शुरंस कंपनीला दिला. (प्रतिनिधी)