शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

विमा कंपनीने नाकारलेला दावा ठरला वैध

By admin | Updated: November 24, 2014 22:59 IST

चोरीला गेलेल्या ट्रकची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहकाने रिलायन्स जनरल विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र विमा कंपनीने फेटाळलेला तो दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण

गोंदिया : चोरीला गेलेल्या ट्रकची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहकाने रिलायन्स जनरल विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र विमा कंपनीने फेटाळलेला तो दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने वैध ठरवून सदर विमा कंपनीला १३ लाख रूपये दरसाल दरशेकडा आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले.तक्रारकर्ता येथील लोहसेवा ट्रान्सपोर्टचे संचालक ताजेंदरसिंग इंदरसिंग छाबडा आहेत. ते टाटा-२५१५ ट्रकचे मालक आहेत. त्यांनी आपल्या ट्रकचा १३ लाख रूपये रकमेचा विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काढला होता. तो विमा १९ आॅगस्ट २०१० ते १८ आॅगस्ट २०११ पर्यंत वैध होता. छाबडा यांचा ट्रक ३ जानेवारी २०११ रोजी फुलचूर नाका येथून चोरीला गेला. त्यांनी त्वरीत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून एजंट जयेश वाटवानी यांना रितसर माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण तपास करूनही पत्ता न लागल्याने २५ जुलै २०११ रोजी अंतिम अहवाल न्यायदंडाधिकाऱ्याकडे सादर करण्यात आला. यानंतर ताजेंदरसिंग यांनी सर्व कागदपत्रांसह १३ लाखांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव जयेश वाटवानी यांच्यामार्फत रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केला. यानंतर वारंवार चौकशी करूनही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून टाळले जात होते. त्यामुळे त्यांनी १४ जून २०१३ रोजी वकिलामार्फत विमा कंपनीस नोटीस बजावली. परंतु कंपनीकडून कसलेही उत्तर आले नाही. यानंतर व्यक्तीश: चौकशी केल्यावर १७ जुलै २०१३ रोजी प्रकरण बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र अशा आशयाचे त्यांना कोणतेही पत्र मिळाले नव्हते. विमा कंपनीने दावा नामंजूर केल्यामुळे ताजेंदरसिंग यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १२ अंतर्गत कंपनीची सेवेतील त्रुटीबाबत विमा दाव्याचे १३ लाख, नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळण्यासाठी ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने १७ फेब्रुवारी २०१४ रोजी तक्रार दाखल करून विमा कंपनीस नोटीस बजावली. कंपनीने लेखी जबाबात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदच्या माहितीअभावी दावा खारिज केल्याचे कळविले. ताजेंदरसिंग यांनी तक्रारीसह विमा पॉलिसी व आरसी बुक यांच्या छायांकित प्रति कलम ३७९ अन्वये नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती, पोलिसांचा अंतिम अहवाल आदी सर्व कागदपत्रे दाखल केल्याचे सांगितले. शिवाय वाहनाची किंमत पॉलिसी काढताना १३ लाख रूपये नोंदविली होती. मात्र विमा कंपनीने विमा दावा सबळ कारणाअभावी फेटाळने म्हणजे सेवेतील त्रुटी होय, असा न्यायनिवाडा ग्राहक मंचने केला.तक्रारकर्ते ताजेंदरसिंग यांच्या बाजूने अ‍ॅड.एस.बी. राजनकर तर विरूद्ध पक्ष रिलायन्स विमा कंपनीच्या बाजूने अ‍ॅड. सुचेता कृपलानी यांनी काम पाहिले. रिलायंस विमा कंपनीने ट्रकच्या (सीजी ०४/जेबी- २०७७) विमादाव्यापोटी १३ लाख रूपये दरसाल दरशेकडा आठ टक्के व्याजाने पैसे हातात पडेपर्यंत द्यावे, तसेच मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला. (प्रतिनिधी)