शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

विमा कंपनीने नाकारलेला दावा ठरला वैध

By admin | Updated: November 24, 2014 22:59 IST

चोरीला गेलेल्या ट्रकची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहकाने रिलायन्स जनरल विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र विमा कंपनीने फेटाळलेला तो दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण

गोंदिया : चोरीला गेलेल्या ट्रकची नुकसानभरपाई मिळावी म्हणून ग्राहकाने रिलायन्स जनरल विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र विमा कंपनीने फेटाळलेला तो दावा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने वैध ठरवून सदर विमा कंपनीला १३ लाख रूपये दरसाल दरशेकडा आठ टक्के व्याजाने देण्याचे आदेश दिले.तक्रारकर्ता येथील लोहसेवा ट्रान्सपोर्टचे संचालक ताजेंदरसिंग इंदरसिंग छाबडा आहेत. ते टाटा-२५१५ ट्रकचे मालक आहेत. त्यांनी आपल्या ट्रकचा १३ लाख रूपये रकमेचा विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काढला होता. तो विमा १९ आॅगस्ट २०१० ते १८ आॅगस्ट २०११ पर्यंत वैध होता. छाबडा यांचा ट्रक ३ जानेवारी २०११ रोजी फुलचूर नाका येथून चोरीला गेला. त्यांनी त्वरीत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून एजंट जयेश वाटवानी यांना रितसर माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण तपास करूनही पत्ता न लागल्याने २५ जुलै २०११ रोजी अंतिम अहवाल न्यायदंडाधिकाऱ्याकडे सादर करण्यात आला. यानंतर ताजेंदरसिंग यांनी सर्व कागदपत्रांसह १३ लाखांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव जयेश वाटवानी यांच्यामार्फत रिलायन्स विमा कंपनीकडे सादर केला. यानंतर वारंवार चौकशी करूनही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून टाळले जात होते. त्यामुळे त्यांनी १४ जून २०१३ रोजी वकिलामार्फत विमा कंपनीस नोटीस बजावली. परंतु कंपनीकडून कसलेही उत्तर आले नाही. यानंतर व्यक्तीश: चौकशी केल्यावर १७ जुलै २०१३ रोजी प्रकरण बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र अशा आशयाचे त्यांना कोणतेही पत्र मिळाले नव्हते. विमा कंपनीने दावा नामंजूर केल्यामुळे ताजेंदरसिंग यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम १२ अंतर्गत कंपनीची सेवेतील त्रुटीबाबत विमा दाव्याचे १३ लाख, नुकसानभरपाई व तक्रार खर्च मिळण्यासाठी ग्राहक न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने १७ फेब्रुवारी २०१४ रोजी तक्रार दाखल करून विमा कंपनीस नोटीस बजावली. कंपनीने लेखी जबाबात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदच्या माहितीअभावी दावा खारिज केल्याचे कळविले. ताजेंदरसिंग यांनी तक्रारीसह विमा पॉलिसी व आरसी बुक यांच्या छायांकित प्रति कलम ३७९ अन्वये नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती, पोलिसांचा अंतिम अहवाल आदी सर्व कागदपत्रे दाखल केल्याचे सांगितले. शिवाय वाहनाची किंमत पॉलिसी काढताना १३ लाख रूपये नोंदविली होती. मात्र विमा कंपनीने विमा दावा सबळ कारणाअभावी फेटाळने म्हणजे सेवेतील त्रुटी होय, असा न्यायनिवाडा ग्राहक मंचने केला.तक्रारकर्ते ताजेंदरसिंग यांच्या बाजूने अ‍ॅड.एस.बी. राजनकर तर विरूद्ध पक्ष रिलायन्स विमा कंपनीच्या बाजूने अ‍ॅड. सुचेता कृपलानी यांनी काम पाहिले. रिलायंस विमा कंपनीने ट्रकच्या (सीजी ०४/जेबी- २०७७) विमादाव्यापोटी १३ लाख रूपये दरसाल दरशेकडा आठ टक्के व्याजाने पैसे हातात पडेपर्यंत द्यावे, तसेच मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला. (प्रतिनिधी)