शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात वणव्याची चौकशी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ...

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ८ एप्रिल २०२१ रोजी आग लागली होती. आग विझविण्याच्या प्रयत्नात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर गंभीररीत्या भाजलेल्या दोन वनमजुरांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा १७ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अग्नी रक्षकांना आवश्यक कीट व सुरक्षा उपकरणे पुरविली नाहीत. तसेच फायर लाईनचे काम केले नाही. परिणामी आगीने आतापर्यंत चार वनमजुरांचा बळी गेला. या घटनेला एक महिना लोटूनही या घटनेची साधी चौकशी झालेली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आग नेमकी कशामुळे व कुणामुळे लागली याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

मार्च ते जून दरम्यान प्रत्येक वर्षी आग लागण्याच्या घटना समोर येतात. उन्हाळ्यात आगीपासून वनांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्र सभोवताल आणि वनक्षेत्रातील रस्त्याच्या बाजूचे गवत व लहान काटेरी झुडपे काढण्याचे काम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केले जाते. त्यास फायर लाईनचे काम तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर वॉचरची फेब्रुवारी ते जूनपर्यंत रोजंदारीवर नेमणूक केली जाते; पण अग्नी रक्षकांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली जात नाहीत. तसेच फायर लाईन दुरुस्तीची कामे वन अधिकारी आपल्या जवळपासच्या कंत्राटदाराचे नाव समोर करून थातुरमातुर काम मजुरांमार्फत केले जाते. मागील पाच वर्षांपासून शासनाच्या आलेल्या निधीची अफरातफर करून कंत्राटदाराला हाताशी धरून त्या रकमेची वाट लावली जाते. प्रत्येक वर्षी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडतात. यादरम्यान गवत, काटेरी झुडपे, मोहफूल व तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर झाल्यानंतर हे काम सुरू केले जाते.

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील बफर झोन क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई आहे. तरीही अज्ञात व्यक्ती जाऊन आग लावून पळून जाते तेव्हा वन्यजीव विभागाचे कर्मचारी व अधिकारी काय करतात. पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात आग लागली होती. या घटनेला महिना लोटला आहे. आतापर्यंत या घटनेत चार मजुरांचा बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका पीडित कुटुंब व परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. एकंदरीत या प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष देऊन आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.