शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात वणव्याची चौकशी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:28 IST

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ...

सडक-अर्जुनी : नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा व पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात ८ एप्रिल २०२१ रोजी आग लागली होती. आग विझविण्याच्या प्रयत्नात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला, तर गंभीररीत्या भाजलेल्या दोन वनमजुरांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा १७ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अग्नी रक्षकांना आवश्यक कीट व सुरक्षा उपकरणे पुरविली नाहीत. तसेच फायर लाईनचे काम केले नाही. परिणामी आगीने आतापर्यंत चार वनमजुरांचा बळी गेला. या घटनेला एक महिना लोटूनही या घटनेची साधी चौकशी झालेली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आग नेमकी कशामुळे व कुणामुळे लागली याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही. एकंदरीत या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकारी कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

मार्च ते जून दरम्यान प्रत्येक वर्षी आग लागण्याच्या घटना समोर येतात. उन्हाळ्यात आगीपासून वनांच्या संरक्षणासाठी वनक्षेत्र सभोवताल आणि वनक्षेत्रातील रस्त्याच्या बाजूचे गवत व लहान काटेरी झुडपे काढण्याचे काम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केले जाते. त्यास फायर लाईनचे काम तसेच आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायर वॉचरची फेब्रुवारी ते जूनपर्यंत रोजंदारीवर नेमणूक केली जाते; पण अग्नी रक्षकांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे उपलब्ध केली जात नाहीत. तसेच फायर लाईन दुरुस्तीची कामे वन अधिकारी आपल्या जवळपासच्या कंत्राटदाराचे नाव समोर करून थातुरमातुर काम मजुरांमार्फत केले जाते. मागील पाच वर्षांपासून शासनाच्या आलेल्या निधीची अफरातफर करून कंत्राटदाराला हाताशी धरून त्या रकमेची वाट लावली जाते. प्रत्येक वर्षी जंगलाला आग लागल्याच्या घटना घडतात. यादरम्यान गवत, काटेरी झुडपे, मोहफूल व तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर झाल्यानंतर हे काम सुरू केले जाते.

नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील बफर झोन क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई आहे. तरीही अज्ञात व्यक्ती जाऊन आग लावून पळून जाते तेव्हा वन्यजीव विभागाचे कर्मचारी व अधिकारी काय करतात. पिटेझरी येथील कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० या परिसरात आग लागली होती. या घटनेला महिना लोटला आहे. आतापर्यंत या घटनेत चार मजुरांचा बळी गेला आहे. परंतु, वनविभागाकडून साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शंका-कुशंका पीडित कुटुंब व परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहेत. एकंदरीत या प्रकरणी चौकशी थंडबस्त्यात पडून आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष देऊन आग कशामुळे लागली याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.