शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

ऐनवेळी परीक्षा रद्द केलेल्यांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

देवरी : आरोग्य विभागाच्या २५ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा ऐन वेळेवर रद्द केल्याने परीक्षार्थींचा झालेला हिरमोड, परीक्षा केंद्र दूरदूर ...

देवरी : आरोग्य विभागाच्या २५ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा ऐन वेळेवर रद्द केल्याने परीक्षार्थींचा झालेला हिरमोड, परीक्षा केंद्र दूरदूर भेटलेल्या परीक्षा केंद्रासाठी गेलेल्या परीक्षार्थींचा विनाकारण प्रवास, परीक्षार्थींना त्यांचा झालेला खर्च, परीक्षा शुल्क, प्रवास भाडे परत देण्यात यावे या मागणीसह ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवरी तालुक्यातील परीक्षार्थींनी केली आहे.

२५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी गट क व गट ड च्या ६०० पदासाठी मेगा भरतीच्या परीक्षा आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या होत्या. सदर भरतीप्रक्रियेसाठी मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. या कंपनीकडे भरतीचे काम करण्यासाठी करारपत्र करण्यात आलेले आहे. यामध्ये कंपनीने संकेतस्थळाची स्थापना करणे, ऑनलाइन अर्ज मागवीणे, उमेदवारांना परीक्षा पत्र देणे, शाळा महाविद्यालय अधिग्रहित करून बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे व गुणवंत यादी तयार करणे ही जबाबदारी कंपनीची होती. या पदासाठी राज्यभरातून लाखो परीक्षार्थींनी अर्ज सादर केलेले होते. खुल्या प्रवर्गातून परीक्षार्थींकडून ५२० रुपये परीक्षा शुल्क, तर आरक्षित प्रवर्गातून २७० रुपये प्रति अर्ज वसूल करण्यात आले होते. याचाच अर्ज कंपनीने अर्ज भरलेल्या लाखो परीक्षार्थींकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केलेली आहे. कधी नव्हे तो एवढा सावळा गोंधळ या भरतीप्रक्रियेमधून दिसून आला.

......

परीक्षेची पूर्वतयारीच नाही

परीक्षार्थींना दूरचे परीक्षा केंद्र दिलेले असल्याने परीक्षार्थींना आर्थिक व मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. देवरी तालुक्यातील परीक्षार्थींना गोंदिया जिल्ह्याचे केंद्र न दिले गेले. परीक्षार्थींना एक दोन दिवस अगोदर केंद्रावर पोहोचावे लागले. २५ सप्टेंबर रोजी परीक्षा असतानादेखील अर्थ असा होतो की कंपनीने परीक्षेची कोणतीही तयारी केल्याचे दिसून येत नाही.

......

परीक्षार्थींना भुर्दंड

परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी ऐनवेळी रात्री १० वाजता या परीक्षा आरोग्य विभागाने रद्द केल्या. परीक्षा रद्द झाल्याची बातमी येऊन धडकली. हा शासन आणि कंपनीने गोरगरीब परीक्षार्थींवर केलेला वज्रघात होता. ही परीक्षा होती की जीवघेणी परीक्षा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही परीक्षा रद्द करणाऱ्यांवर चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी देवरी तालुक्यातील परीक्षार्थींना केली आहे.