शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

ग्रामसभेविषयी अनास्था ठरतेय गावच्या विकासात बाधा

By admin | Updated: May 15, 2014 01:26 IST

सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून..

आमगाव : सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून अनेक ठिकाणी ग्रामसभेबद्दल ग्रामपंचायत सदस्यांसह गावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक गावांमध्ये ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती केवळ नावापुरतीच असते. ग्रामपंचायतचा शिपाईघरोघरी जाऊन अथवा पायरीवर बसून ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या घेत असल्याचे चित्र अनेक गावात पाहवयास मिळते. त्यामुळे ग्रामसभेत मांडलेले कित्येक संकल्प हवेतच विरून जातात. प्रत्येकवेळी नवीन संकल्प करण्याची वेळ ग्रामसभेवर येत आहे. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या एकदशांश लोकही ग्रामसभेत उपस्थित राहत नसल्याने सभेचे ठराव केवळ कागदोपत्रीच दिसत येत आहे. ते प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी येत असतात.६३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरीब महिला व अन्य वंचित समाजघटकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावे, या दृष्टीने ग्रामसभेची रचना करण्यात आली.ग्रामस्थांच्या सहभागामुळे सक्रीय लोकशाहीचा अनुभव यावा, कारभारात पारदर्शकता येऊन जबाबदारीने सामूहिक यश दिसून यावे, हा ग्रामसभेचा मूळ हेतू आहे. दुरूस्तीत केलेल्या सूचनेनुसार तीन महिन्यातून एकदा तरी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.विशेषत: प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, अशा वेळी गावाच्या गरजा पाहून ग्रामपंचायतने कोणती विकास कामे हाती घ्यावीत. हे ग्रामसभेकडून निश्‍चीत होणे अपेक्षित असते.वार्षिक योजना मंजूर करणे, महिला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घेणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुधारणा व काटकसर सुचविण्यासाठी पुढाकार घेणे, कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, दारिद्रय़रेषेखालील यादीवर चर्चाकरणे, गावाच्या हद्दीतील सर्वनैसर्गिक साधनसंपत्तीवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलणे, असे ग्रामसभेचे स्वरूप व कार्य आहे.पंचायत तरतुदी कायदा १९१९ नुसार जंगलापासून मिळणार्‍या किरकोळ उत्पादनाची मालकी, विकास कामांना मंजुरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड, जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात विचारविनिमय, लघु जलसिंचन योजनेचे व्यवस्थापन नशा आणण्यार्‍या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणे, दारूबंदीवर चर्चा, अवैध धंद्यावर बंदी घालणे, गावाच्या बाजाराचे व्यवस्थापन, सर्वसामाजिक क्षेत्रातील संस्था व संस्थाचालकांवर नियंत्रण अनेक अधिकार, ग्रामपंचायला आहे.त्याची माहिती नसल्याने बरेच गावकरी ग्रामसभेबाबत अनभिज्ञ आहेत.(शहर प्रतिनिधी)