शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

ग्रामसभेविषयी अनास्था ठरतेय गावच्या विकासात बाधा

By admin | Updated: May 15, 2014 01:26 IST

सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून..

आमगाव : सध्याच्या काळात ग्रामसभेबद्दल ग्रावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे सर्वत्र दिसून येते. ग्रामसभेची उद्दिष्ट्ये स्वरूप, याविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती नसल्याने ग्रामसभेला प्रतिसाद मिळत नसून अनेक ठिकाणी ग्रामसभेबद्दल ग्रामपंचायत सदस्यांसह गावकर्‍यांना विशेष रूची नसल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक गावांमध्ये ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती केवळ नावापुरतीच असते. ग्रामपंचायतचा शिपाईघरोघरी जाऊन अथवा पायरीवर बसून ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या घेत असल्याचे चित्र अनेक गावात पाहवयास मिळते. त्यामुळे ग्रामसभेत मांडलेले कित्येक संकल्प हवेतच विरून जातात. प्रत्येकवेळी नवीन संकल्प करण्याची वेळ ग्रामसभेवर येत आहे. गावाच्या एकूण लोकसंख्येच्या एकदशांश लोकही ग्रामसभेत उपस्थित राहत नसल्याने सभेचे ठराव केवळ कागदोपत्रीच दिसत येत आहे. ते प्रत्यक्षात आणताना अनेक अडचणी येत असतात.६३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरीब महिला व अन्य वंचित समाजघटकांना त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता यावे, या दृष्टीने ग्रामसभेची रचना करण्यात आली.ग्रामस्थांच्या सहभागामुळे सक्रीय लोकशाहीचा अनुभव यावा, कारभारात पारदर्शकता येऊन जबाबदारीने सामूहिक यश दिसून यावे, हा ग्रामसभेचा मूळ हेतू आहे. दुरूस्तीत केलेल्या सूचनेनुसार तीन महिन्यातून एकदा तरी ग्रामसभा घेणे आवश्यक आहे.विशेषत: प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, अशा वेळी गावाच्या गरजा पाहून ग्रामपंचायतने कोणती विकास कामे हाती घ्यावीत. हे ग्रामसभेकडून निश्‍चीत होणे अपेक्षित असते.वार्षिक योजना मंजूर करणे, महिला अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभाग घेणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात सुधारणा व काटकसर सुचविण्यासाठी पुढाकार घेणे, कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, दारिद्रय़रेषेखालील यादीवर चर्चाकरणे, गावाच्या हद्दीतील सर्वनैसर्गिक साधनसंपत्तीवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलणे, असे ग्रामसभेचे स्वरूप व कार्य आहे.पंचायत तरतुदी कायदा १९१९ नुसार जंगलापासून मिळणार्‍या किरकोळ उत्पादनाची मालकी, विकास कामांना मंजुरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची निवड, जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भात विचारविनिमय, लघु जलसिंचन योजनेचे व्यवस्थापन नशा आणण्यार्‍या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणणे, दारूबंदीवर चर्चा, अवैध धंद्यावर बंदी घालणे, गावाच्या बाजाराचे व्यवस्थापन, सर्वसामाजिक क्षेत्रातील संस्था व संस्थाचालकांवर नियंत्रण अनेक अधिकार, ग्रामपंचायला आहे.त्याची माहिती नसल्याने बरेच गावकरी ग्रामसभेबाबत अनभिज्ञ आहेत.(शहर प्रतिनिधी)