शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

संवाद यात्रेमधून मिळेल शेतकऱ्यांना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:37 IST

केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून

राजकुमार बडोले : भाजपाची शिवार संवाद यात्रा सुरूलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून गुरूवार २५ मेपासून संपूर्ण राज्यात शिवार संवाद यात्रा सुरू होत आहे. या अंतर्गत २५ ते २८ मे दरम्यान जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व लोकप्रतिनीधी या यात्रेत सहभागी होऊन शेतातील बांद्यांवर जावून शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधणार आहेत. त्यांना सरकारने केलेल्या कामांची व योजनांची माहिती देवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची ही यात्रा असून सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी नियोजनानुसार कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. मंगळवारी २३ मे रोजी शासकीय विश्रामगृहात भाजपाच्या प्रमुख पदाधिकाधिऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. बैठकीत प्रामुख्याने आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, नगरसेवक भरत क्षित्रय, दिनेश दादरीवाल, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, २५ ते २८ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात शिवार संवाद यात्रेतून शेतकीऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. पुढील १५ दिवसांत पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्य विस्तारक योजनेंतर्गत प्रत्येक बुथवर जावून घरोघरी भेटी देण्याचे कार्यक्रम, भाजपा आजीवन सहयोग निधी आदी कार्यक्रम नियोजनानुसार करण्याचे सांगितले. याप्रसंगी माजी आमदार केशवराव मानकर व संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच आजीवन सहयोग निधीबाबत नगरसेवक भरत क्षत्रिय व दिनेश दादरीवाल यांनी माहिती दिली. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाकरिता जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, मंडळ अध्यक्ष लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे यांचे ना. बडोले यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केले. या वेळी बैठकीत मंडळ अध्यक्ष सुनील केलनका, छत्रपाल तुरकर, लक्ष्मण भगत, भाऊदास कठाणे, प्रमोद संगीडवार, अ‍ॅड. येशुलाल उपराडे, विजय बिसेन, परसराम फुंडे, धनेंद्र अटरे, मुन्ना शर्मा, नरेंद्र बाजपेयी, खेमराज लिल्हारे, प्रविण दहीकर, देवेंद्र टेंभरे, पवन अग्रवाल, आत्माराम दसरे, सुरेश पटले, महेंद्र बघेले आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्र्यांचा दौरा पालकंमत्री राजकुमार बडोले हे २५ मेपासून शिवार संवाद कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे २५ मे रोजी अर्जुनी-मोर तालुक्यातील रांझीटोला येथे सकाळी ११ वाजता, येनोडी-जांभळी येथे दुपारी १२ वाजता , दुपारी १ वाजता धाबेपवनी येथे तर २ वाजता पांढरवाणी-रयत येथे उपस्थित झाले. त्याचबरोबर सडक अर्जुनी तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार असून येथील कोसमघाट येथे दुपारी ३ वाजता, खोडशिवनी येथे ४ वाजता तर डव्वा येथे पाच वाजता उपस्थित राहून शेतकीयांशी सवांद साधला. तर शुक्रवारी २६ मे रोजी आमगाव -देवरी विधान सभा क्षेत्राचा दौरा करणार असून सकाळी ११.३० वाजता साखरीटोला ( तिरखेडी) येथील पुलाचे लोकार्पण, दुपारी १२ .३० वाजता सलंगटोला शेतशिवार संवाद तर सायंकाळी ५ वाजता गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथे शेत शिवार संवादातून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.