शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिवार संवादातून शासकीय योजनांची माहिती

By admin | Updated: June 2, 2017 01:27 IST

तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये

ग्रामीण भागात सभा : विकास कामांवरही टाकला प्रकाश लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यात शिवार संवाद सभेच्या माध्यमातून आमदार विजय रहांगडाले यांनी संवाद साधला असून त्यामध्ये शासकीय योजनांची माहिती देवून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यात राज्य सरकारने आतापर्यंत प्रामुख्याने राज्यातील ६८.६६ लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केला असून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, १४ जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा शेतकऱ्यांना लाभ, तसेच ५०० कोटी लोकसहभागातून दोन वर्षात ११,४८६ गावांमध्ये २,६५,६७८ कामे आतापर्यंत केलेली असून अवघ्या ३,४२२ कोटी रुपयात ११६४,३४७ हेक्टर इतकी सिंचनक्षमता वाढली आहे. तसेच कृषी विभागांतर्गत मागेल त्याला शेततळे अंतर्गत ५२ हजार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड झालेली असून ४५ हजार शेततळ्यांना मंजूरी देण्यात आली. त्यामधून ९ हजार शेततळी पूर्ण झालेली आहेत. तसेच २०१९ पर्यंत दुष्काळमुक्तीकडे शासनाची वाटचाल सुरु असल्याचे सांगीतले. राज्यातील कृषीसिंचन क्षेत्र १६.०३ लाख हेक्टरवरून २०१५-१६ मध्ये १९.२२ लाख हेक्टर वर पोहोचली आहे. राज्यात २६ मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या पूर्तीसाठी केंद्राकडून ३८३० कोटी रु. तसेच नाबार्डकडून १२,८०० कोटी रुपये एवढी भरीव मदत झालेली आहे. तसेच पूर्व विदर्भात मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाची विशेष मोहीम राबविली जात असून तालुक्याता भात खाचर दुरुस्ती व तलाव खोलीकरणाचे काम सुरु आहेत. तसेच जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तिरोडा तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १४ गावे, सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, सन २०१७-१८ मध्ये १० गावांची निवड तसेच गोरेगाव तालुक्यात सन २०१५-१६ मध्ये १ गाव, सन २०१६-१७ मध्ये ७ गावे, सन २०१७-१८ मध्ये ७ गावे असे विधानसभा क्षेत्रात ४८ गावामध्ये जलयुक्त शिवाराची कामे पूर्ण झाली असून त्याचा फायदा जनतेस होत आहे असे सांगीतले. ही सर्व विकासकामे सुरु असून यामध्ये कामांचा दर्जा चांगला होण्यासाठी संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे व यासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी शिवार संवाद चर्चेतून केले. तसेच शासनाने शेतकऱ्यांसाठी बी,बियाणे, खत पुरवठा, विज पुरवठा सुरळीत चालण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. शिवार संवाद सभा तालुक्यात अर्जुनी, नहरटोला, मुंडीपार येथे घेतली असून शिवार संवाद सभेत प्रामुख्याने कृऊबास तिरोडाचे नवनिर्वाचीत संचालक डॉ. चिंतामण रहांगडाले, चतुर्भूज बिसेन, डॉ. वसंत भगत, पं.स.सदस्य डॉ. बी.एस.रहांगडाले, संजयसिंह बैस, तहसीलदार रामटेके, कुंभरे, गटविकास अधिकारी मानकर उपस्थित होते.