शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महागाईमुळे किचनचे गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढणार, असे सर्वत्र म्हटले जात होते. मात्र, आता या युद्धाचे पडसाद उमटू लागले आहेत. महागाईने आता आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून, प्रत्येकच वस्तूंचे दर आता वाढताना दिसत आहे. स्वयंपाकासाठी सर्वात महत्त्वाच्या खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाला असून, याशिवाय अन्य किराणामालही चांगलाच वधारला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

गहू का महागला? -    व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या जगात ३५ टक्के गहू रशियातून पुरवला जातो. आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने रशियाकडून गव्हाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गव्हाचे दर वधारले आहेत. शिवाय अशा परिस्थितीत भारतातून गव्हाला मागणी वाढणार व त्यामुळेही गव्हाचे दर वाढले असून, येत्या काळातही अशीच स्थिती राहणार, असे दिसून येत आहे. 

सुर्यफूल व पामतेल बंद भारतात सुर्यफूल, सोयाबीन व पामतेल विदेशातून येते. यातील सुर्यफूल व सोयाबीन तेल रशिया व युक्रेन येथून येते. आता रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा पुरवठा या देशांनी बंद केला आहे. परिणामी तेलांचे दर वधारले आहे. विशेष म्हणजे, या देशांकडे तेल आहे मात्र युद्धामुळे त्यांच्याकडून पुरवठा बंद असल्याने हा सर्व परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगतात. 

किचनचे बजेट कोलमडले 

युद्धामुळे महागाई वाढणार, असे सांगितले जात असतानाच आता त्याचे परिणाम दिसत आहे. खाद्यतेलाचे दर वधारलेले असतानाच किराणामालाचे दरही वधारले आहेत. अशात सर्वसामान्यांनी आता काय खावे, असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी तेव्हाच सर्वसामान्यांना दोन घास मिळतील. - सीमा बैतुले (गृहिणी) 

खाद्यतेलांचे दर वधारले असल्याने स्वयंपाक करताना तेलाचा वापर सांभाळूनच करावा लागतो. अशात आता किराणामालाचेही दर वधारल्याने सर्वसामान्यांना दोनवेळचे जेवणही कठीण झाले आहे. गहू, कणिक, रवा, मैदा सर्वच महागले अशात काय खरेदी करावे व काय खावे, असा प्रश्न पडतो. - रेखा इंगळे (गृहिणी) 

अशीच स्थिती राहणार...रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे. मात्र, आता हे दर कमी होतील, असे वाटत नाही. तसेच युद्ध थांबले तरीही त्यानंतर आणखी २-३ महिने अशीच स्थिती राहणार आहे. - बालचंद मुलचंदानी (व्यापारी)

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल