शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे किचनचे गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  रशिया - युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढणार, असे सर्वत्र म्हटले जात होते. मात्र, आता या युद्धाचे पडसाद उमटू लागले आहेत. महागाईने आता आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली असून, प्रत्येकच वस्तूंचे दर आता वाढताना दिसत आहे. स्वयंपाकासाठी सर्वात महत्त्वाच्या खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाला असून, याशिवाय अन्य किराणामालही चांगलाच वधारला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे महिन्याचा बजेट बिघडले आहे. यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असून, काय खावे अशा प्रश्न ते करत आहेत. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी, ही एकच मागणी जोर धरू लागली आहे. 

गहू का महागला? -    व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या जगात ३५ टक्के गहू रशियातून पुरवला जातो. आता रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने रशियाकडून गव्हाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गव्हाचे दर वधारले आहेत. शिवाय अशा परिस्थितीत भारतातून गव्हाला मागणी वाढणार व त्यामुळेही गव्हाचे दर वाढले असून, येत्या काळातही अशीच स्थिती राहणार, असे दिसून येत आहे. 

सुर्यफूल व पामतेल बंद भारतात सुर्यफूल, सोयाबीन व पामतेल विदेशातून येते. यातील सुर्यफूल व सोयाबीन तेल रशिया व युक्रेन येथून येते. आता रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाचा पुरवठा या देशांनी बंद केला आहे. परिणामी तेलांचे दर वधारले आहे. विशेष म्हणजे, या देशांकडे तेल आहे मात्र युद्धामुळे त्यांच्याकडून पुरवठा बंद असल्याने हा सर्व परिणाम जाणवत असल्याचे व्यापारी सांगतात. 

किचनचे बजेट कोलमडले 

युद्धामुळे महागाई वाढणार, असे सांगितले जात असतानाच आता त्याचे परिणाम दिसत आहे. खाद्यतेलाचे दर वधारलेले असतानाच किराणामालाचे दरही वधारले आहेत. अशात सर्वसामान्यांनी आता काय खावे, असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणावी तेव्हाच सर्वसामान्यांना दोन घास मिळतील. - सीमा बैतुले (गृहिणी) 

खाद्यतेलांचे दर वधारले असल्याने स्वयंपाक करताना तेलाचा वापर सांभाळूनच करावा लागतो. अशात आता किराणामालाचेही दर वधारल्याने सर्वसामान्यांना दोनवेळचे जेवणही कठीण झाले आहे. गहू, कणिक, रवा, मैदा सर्वच महागले अशात काय खरेदी करावे व काय खावे, असा प्रश्न पडतो. - रेखा इंगळे (गृहिणी) 

अशीच स्थिती राहणार...रशिया व युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा परिणाम आहे. मात्र, आता हे दर कमी होतील, असे वाटत नाही. तसेच युद्ध थांबले तरीही त्यानंतर आणखी २-३ महिने अशीच स्थिती राहणार आहे. - बालचंद मुलचंदानी (व्यापारी)

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल