शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

महागाईचा केला तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:53 IST

वाढती महागाई, आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी हैराण आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देराकाँचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रोष

ऑनलाईन लोकमतकाचेवानी : वाढती महागाई, आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी हैराण आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाईवर नियंत्रण आणि जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तालुका राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले.या वेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अनुपस्थित असल्याने तीव्र रोष व्यक्त करीत निवासी तहसीलदार आर.जे. वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले. शासनाने वाढवलेली महागाई, अधिकाऱ्यांची मनमानी व विविध योजनांबाबत होणारी जनतेची पिळवणूक यावर चर्चा करण्यात आली. निवेदन देतेवेळी चर्चेकरिता सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित रहावे असे कळविण्यात आले होते. यानंतरही तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांसह अनेक विभागप्रमुख गैरहजर असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. उज्ज्वला गॅसच्या नावे जनतेची दिशाभूल केली जात आहे. अनुदान थेट खातेदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे. पेट्रोलचे दर ८१.७३ रूपये झाले. त्यात दोन रूपये घट करून पुन्हा आठ रूपये वाढविण्यात आले. तसेच डिझेलचे दर ६७ रूपये करण्यात आले. डाळ, तेल व भाजीपाल्याचे दर बेभाव वाढविण्यात आले. त्यामुळे गरिबांची फजिती होत असून हे दर शासनाने कमी करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.रेशन दुकानातून साखर हटविण्यात आली. धान २१०० रूपये क्विंटल तर तांदूळ ५० रूपये किलो दुकानात मिळते. ही शेतकऱ्यांची सर्रास लूट असल्याचे सांगण्यात आले. पाण्याअभावी धान लागवड करण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र चाºयाच्या व्यवस्थेसंबंधी शासनाकडे आजही अहवाल पाठविण्यात आला नाही, असे माजी आ. बन्सोड म्हणाले.मग्रारोहयोच्या मजुरांना काम देण्यात येते. मात्र तीन महिन्यांपासून वेतन दिले जात नाही. ते त्वरित देण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची समस्या, मुद्रा लोन याबाबत प्रस्ताव किती आले, किती लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले, याची माहिती नाही. वृद्ध कलाकारांना मानधन देण्यात येत नाही, ते देण्यात यावे. सरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशा अनेक विषयांवर चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.या वेळी माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन यांनी संपूर्ण तालुक्याला पीक विमा देण्यात यावा, असे म्हटले. तर पाणी व घरकुलांचा लाभ गरजूंना प्रथम मिळावा. विहिरीत बोअरवेल व १०० दिवस मजुरांना काम यावर जि.प. सदस्य मनोज डोंगरे व कैलाश पटले यांनी चर्चा केली.निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात तालुका राकाँ अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, पं.स. सभापती निता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, जि.प. सदस्य वीणा पटले, प्रीती रामटेके, मनोज डोंगरे, सुनिता मडावी, उषा किंदरले, ललिता जांभूळकर, डॉ. किशोर पारधी, पं.स. सदस्य प्रदीप मेश्राम, माया शरणागत, नरेश कुंभारे, निम्रात पटले, रेवाशंकर पटले, बबलदास रामटेके यांच्यासह सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.५९१९ शेतकऱ्यांना कर्जमाफीसंपूर्ण तिरोडा तालुक्यातून १४ हजार २२७ पीककर्जाचे प्रस्ताव गेले आहेत. यापैकी ५९१९ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. तर थकीत ९५०८ व चालू ४७१९ आहेत, अशी माहिती देण्यात आली. यावर मार्चअखेर सर्वांना कर्जमाफी मिळून एप्रिलनंतर नव्याने कर्ज मिळेल का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.बीडीओंचे आश्वासनतिरोड्याचे गट विकास अधिकारी जावेद इनामदार यांनी, ६० ते ७० बोअरवेल्सची मागणी केली आहे. मजुरांचे वेतन देण्यात आले आहे व देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. घरकुलांची समस्या लवकरच दूर होईल. मार्च-एप्रिलमध्ये तिरोड्याला अधिक घरकूल मिळण्याची आशा आहे, असे ते म्हणाले.