शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

महागाईच्या चटक्याने फळे झाली कडू

By admin | Updated: April 22, 2017 02:36 IST

उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो.

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर : पौष्टिक आहार झाला दुरापास्त गोंदिया : उन्हाळ्यात ताजेतवाने राहून सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा आहारात वापर केला जातो. पौष्टिक आहाराची खाण असलेली फळे आज मात्र महागाईच्या चटक्याने भाजल्या गेली आहेत. फळांचे दर ऐकताच घाम येणार आज अशी स्थिती असून महागाईच्या चटक्याने फळे कडू झाली आहेत. त्यामुळे शरीराला लागणारा पौष्टिक आहारच आता हिरावला गेला आहे. आज प्रत्येकच पदार्थांत रसायनांचा वापर व भेसळ होत असल्याने खाद्यान्यांतील पौष्टीकता व सकसपणा लोप पावला आहे. त्यामुळे जेवणालाही पूर्वी सारखा रूचकरपणा उरलेला नाही. अशात दररोजच्या जेवणासह शरीराला आवश्यक असलेल्या जीवनसत्वांसाठी फलाहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. फळांतून शरिराला आवश्यक ते जीवनसत्व मिळतात. मात्र आजची महागाई जेथे दोन वेळचे जेवण हिरावून घेत आहे तेथे फळांची तमा काय अशी स्थिती बघावयास मिळत आहे. कधी कांदा, कधी डाळ तर कधी टमाटर डोळे वटारते. अशात कोणकोणत्या वस्तूंचा त्याग करायचा हा प्रश्न पडतो. मात्र पोटाची आग शमविण्यासाठी खिशात हात घालावाच लागतो. पौष्टीक जीवनसत्वांची खाण असलेल्या फळांनाही या महागाईने आपल्या पाशातून सोडले नसल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की, आज बाजारात मिळणाऱ्या फळांचे दर एवढे चढले आहेत की, दर ऐकताच हातपाय गळतात. अशात एखाद्या स्वस्थ माणसाला तर सोडाच मात्र आजारी माणसालाही फळं खायला देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. म्हणूनच महागाईच्या चटक्याने फळं कडू झाले म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी) फळे होणार गायब एरवी बाजारात दिसणारी काही फळे उन्हाळ्यात मात्र दिसत नाहीत. उन्हाळ््यात हिरव्या भाज्या ज्याप्रमाणे बाजारात येत नाहीत, त्याचप्रकारे काही फळेही बाजारातून गायब होतात. यात संत्री, अंगूर व डाळींबांचा समावेश आहे. उन्हाळ््यात या फळांचे उत्पादन होत नसल्याने ही फळे आता बाजारात येणार नसल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत. फळांच्या राजाची धूम उन्हाळा म्हटला म्हणजे फळांच्या राजाचा हंगाम. त्यामुळे सध्या बाजारात आंब्याची चांगलीच धूम आहे. फळविक्रेत्यांकडे सध्या बैगनफल्ली, तोतापूरी व हापूस आंबा बघावयास मिळत आहे. यात बैगनफल्ली ६० रूपये किलो, तोतापूरी ४० किलो तर हापूस आंबा मात्र ६०० रूपये डझनच्या दराने विक्री केला जात आहे. वर्षातून एकदाच फळांचा राजा बाजारात येत असल्याने नागरिकांकडून त्याचा मनसोक्त आनंद लुटला जात आहे.