शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

कपिल केकत गोंदिया : मागील वर्षभरापासून सातत्याने सुरू असलेल्या महागाईचा भडका आताही काही थांबलेला नाही. पेट्रोल-डिझेलपासून सुरू झालेली ही ...

कपिल केकत

गोंदिया : मागील वर्षभरापासून सातत्याने सुरू असलेल्या महागाईचा भडका आताही काही थांबलेला नाही. पेट्रोल-डिझेलपासून सुरू झालेली ही महागाई आता सर्वच वस्तूंना होरपळून टाकत आहे. यामुळे मात्र सर्वसामान्यांना खाणे-पिणे त्यातच वाहन चालविणेही कठीण झाले आहे. किराणा असो की, भाजीपाला स्वस्त म्हणून आज काहीच उरलेले नाही. अशात चैनीच्या वस्तू तर सोडाच, मात्र जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करणेही कठीण होत आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्यांना आता दिवस काढणेही कठीण होत आहे.

--------------------------------------

१) तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च

वस्तू वाढलेला खर्च (रुपयांमध्ये)

खाद्य तेल - ९५०

शेंगदाणे- १६०

साखर- २३४

साबुदाणा- १४०

चहापूड- ५००

तूरडाळ- २००

गॅस सिलिंडर ९५५

पेट्रोल- ४०००

एकूण- ७१३९

---------------------------

ताटातून वरण गायब

जेवणाचे ताट म्हटले म्हणजे त्यात वरण, भात, भाजी व पोळी असा क्रम गणला जातो. विशेष म्हणजे, हा सर्व पदार्थ नसल्यास जेवण अधुरे वाटते. मात्र आजघडीला वाढलेल्या महागाईमुळे जेवणाच्या ताटातील वरण हा पहिला पदार्थच आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाला आहे. तुरीची डाळ १०० रूपयांवर असल्याने ताटातून वरण हळूहळू गायब होत आहे.

-----------------------

३) अशी वाढली महागाई

जानेवारीतील दर सध्याचा दर (प्रतिकिलो रूपयांत)

शेंगदाणा तेल - १७०- १९०

सोयाबीन तेल - १४०- १६०

शेंगदाणे- १५०-१६०

साखर- ३३- ३९

साबुदाणा- ६०-७०

मसाले- ८००- १०००

चहापूड-४००-५००

तूरडाळ- ९०- १००

मूगडाळ- ११०- १२०

उडीद डाळ- ११०- १२०

हरभरा डाळ- ६५- ७५

-----------------------------------

सिलिंडर हजाराच्या घरात

आजघडीला जेथे सर्वच पदार्थांचे दर वाढले असून किराणा खरेदी करताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे. अशात आता स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलिंडरही ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. अशात महिन्याला आता हजार रूपयांचा सिलिंडर खरेदी करावा लागणार असे दिसताच काय खावे व काय शिजवावे असा प्रश्न गृहिणींना पडत आहे.

-------------------------

गृहिणी म्हणतात...

अगोदर माझा किराणा ३५०० ते ५००० रूपयांत होत होता. मात्र आता महागाईमुळे १०००० हजारावर फक्त किराणा जात आहे. त्यानंतर हजार रूपयांचा सिलिंडर झाला असून पेट्रोल- वीजबिल व अन्य खर्च लागून आहेच. एवढ्यानंतर काही नवीन करायचे म्हणजे प्रश्नच पडत असून हे सर्व आता असह्य होत आहे. महागाईवर नियंत्रण गरजेचे आहे.

- सीमा बढे

-------------------------

आजघडीला सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. सिलिंडर आता हजार रूपयांच्या घरात गेला असून किराणा खरेदी करता करताच बजेट बिघडून जातो. अन्य दैनंदिन खर्चसुद्धा डोकेदुखी वाढवीत आहेत. अशात सर्वसामान्यांनी काय खावे हाच प्रश्न पडतो. शासनाने सर्वप्रथम महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांची सोय करावी.

- मीनल बैस