शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

रावणवाडी परिसरात आजाराची लागण

By admin | Updated: September 29, 2014 00:48 IST

मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या पावसाळ्यात बऱ्याच महिला पुरूषांना डेंग्युची लागण झाली. यापूर्वी नागरा-चांदणीटोला येथील एका

रावणवाडी : मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या पावसाळ्यात बऱ्याच महिला पुरूषांना डेंग्युची लागण झाली. यापूर्वी नागरा-चांदणीटोला येथील एका नागरिकाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. सध्या ताप आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण रक्त तपासणीत बाधित आढळून आले आहेत. यापूर्वी डेंग्युने एकाचा मृत्यू झाला. अनेक रुग्ण डेंग्युने ग्रसीत आहेत. यामुळे गाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे. रावणवाडी येथील स्वाती गजभीये, चारगाव येथील प्रगती बिसेन या दोन्ही रुग्णांची रक्त तपासणीत करण्यात आली. यात डेंग्यूची नमुने पॉझिटिव्ह आले. मागील आठ-दहा दिवसापूर्वी गावात आणि परिसरात आरोग्य विभाग रावणवाडीच्या वतीने गावात डासनाशकाची फवारणी झाली. परंतु मलेरिया, डेंग्युचे रुग्ण सतत वाढत असल्यामुळे झालेली डासनाशक फवारणी प्रत्येक्षात झाली की देखावाच करण्यात आला, अशा प्रश्न येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. रावणवाडी आरोग्य केंद्रावर आरोग्य सहायक यांची नियुक्ती सबंधित विभागाने केली आहे. डासनाशकाची फवारणीचे कार्य याचाच माध्यमातून होत आहे. या कामाकरिता जवळपास पाच कर्मचाऱ्यांची नियुक्तीही विभागाने केली आहे. आपल्यावर असलेल्या दायित्वाकडे दुर्लक्ष करून फवारणीच्या कामापासून सतत कोसो दूरच असतात. परिसरात डास नाशकाची फवारणी झालीच नाही, अशा बोंबा गावात ऐकण्यास मिळतात. परिसरात डास नाशकाची फवारणी झाली तरी डासांचा हल्ला सतत सुरूच आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. फवारणी करण्याचा कामावर दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. आरोग्य सहायकावर वरिष्ठाची मेहरबानी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शासन डासनाशक फवारणी करिता आरोग्य केंद्राना ४,५०० रूपये प्रति किलो दराने औषध पुरवित आहे. ही औषध महागडी असल्यामुळे फवारणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आरोग्य पर्यवेक्षक फवारणी करताना हजर राहणे आवश्यक आहे. मात्र फवारणी करतेवेळी पर्यवेक्षक उपस्थित राहात नाही. फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी औषधाची हवी ती मात्रा न टाकता कमी मात्रा टाकून निरमा पावडरच्या उपयोग करून फवारणी झाली असल्याची नागरिकांत चर्चा आहे. उर्वरित डासनाशक औषध आरोग्य निरीक्षकाच्या संगणमताने फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ती औषध भात पिकावर फवारणी करण्यासाठी विकण्याचे कामही सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.