शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विषमता दूर करणारे साहित्य आवश्यक

By admin | Updated: June 28, 2015 01:17 IST

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ....

उषाकिरण आत्राम : भाषा संशोधन कार्य सुरूविजय मानकर सालेकसाइलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आजचे साहित्य अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे विषमता दूर करणारे साहित्य निर्मित करणे आजही प्रासंगिक व आवश्यक आहे, असे मत राज्यातील ज्येष्ठ आदिवासी लेखिका व कथाकार उषाकिरण आत्राम (ताराम) यांनी व्यक्त केले. केले. आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सदर प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार प्रकट केले. लोकमतशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, राज्यात देशात काही उच्चवर्गीय मानल्या जाणाऱ्या तथाकथित लोकांनी आपल्या सोयीनुसार व स्वार्थाला अनुरुप साहित्य निर्मिती केली. त्यामुळे देशात काही मर्यादित लोकांचाच विकास होत गेला व गरीब, गरजू, शोषित, पिडित लोक उपेक्षितच राहिले. काही मूठभर लोकांनी स्वत:ला श्रेष्ठ बनवून शोषित-पीडितांमध्येसुद्धा तसाच विश्वास प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला. सकल समाजाला एका रांगेत उभे करण्यासाठी आज विषमता दूर करण्याचा संदेश देणारे साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र या कामात शासनाने सुद्धा योग्य धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची सुद्धा गरज आहे. समाजामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रभावाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या चांगल्या वाईट गोष्टी दाखविल्या जातात त्यामधून आजची युवा पिढी वाईट कृतीचे जास्त अनुकरण करीत असते. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. माध्यमांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उषाकिरण आत्राम आपल्या लेखणीतून लेख, कथा, कविता इत्यादींची नेहमी निर्मिती करीत असतात.