शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विषमता दूर करणारे साहित्य आवश्यक

By admin | Updated: June 28, 2015 01:17 IST

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ....

उषाकिरण आत्राम : भाषा संशोधन कार्य सुरूविजय मानकर सालेकसाइलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आजचे साहित्य अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे विषमता दूर करणारे साहित्य निर्मित करणे आजही प्रासंगिक व आवश्यक आहे, असे मत राज्यातील ज्येष्ठ आदिवासी लेखिका व कथाकार उषाकिरण आत्राम (ताराम) यांनी व्यक्त केले. केले. आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सदर प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार प्रकट केले. लोकमतशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, राज्यात देशात काही उच्चवर्गीय मानल्या जाणाऱ्या तथाकथित लोकांनी आपल्या सोयीनुसार व स्वार्थाला अनुरुप साहित्य निर्मिती केली. त्यामुळे देशात काही मर्यादित लोकांचाच विकास होत गेला व गरीब, गरजू, शोषित, पिडित लोक उपेक्षितच राहिले. काही मूठभर लोकांनी स्वत:ला श्रेष्ठ बनवून शोषित-पीडितांमध्येसुद्धा तसाच विश्वास प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला. सकल समाजाला एका रांगेत उभे करण्यासाठी आज विषमता दूर करण्याचा संदेश देणारे साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र या कामात शासनाने सुद्धा योग्य धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची सुद्धा गरज आहे. समाजामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रभावाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या चांगल्या वाईट गोष्टी दाखविल्या जातात त्यामधून आजची युवा पिढी वाईट कृतीचे जास्त अनुकरण करीत असते. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. माध्यमांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उषाकिरण आत्राम आपल्या लेखणीतून लेख, कथा, कविता इत्यादींची नेहमी निर्मिती करीत असतात.