शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

विषमता दूर करणारे साहित्य आवश्यक

By admin | Updated: June 28, 2015 01:17 IST

इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ....

उषाकिरण आत्राम : भाषा संशोधन कार्य सुरूविजय मानकर सालेकसाइलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कितीही प्रचार प्रसार होत असला तरी छापील माध्यमातूनच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आजचे साहित्य अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे विषमता दूर करणारे साहित्य निर्मित करणे आजही प्रासंगिक व आवश्यक आहे, असे मत राज्यातील ज्येष्ठ आदिवासी लेखिका व कथाकार उषाकिरण आत्राम (ताराम) यांनी व्यक्त केले. केले. आंचलिक भाषा संशोधन केंद्र धनेगाव येथे सदर प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार प्रकट केले. लोकमतशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, राज्यात देशात काही उच्चवर्गीय मानल्या जाणाऱ्या तथाकथित लोकांनी आपल्या सोयीनुसार व स्वार्थाला अनुरुप साहित्य निर्मिती केली. त्यामुळे देशात काही मर्यादित लोकांचाच विकास होत गेला व गरीब, गरजू, शोषित, पिडित लोक उपेक्षितच राहिले. काही मूठभर लोकांनी स्वत:ला श्रेष्ठ बनवून शोषित-पीडितांमध्येसुद्धा तसाच विश्वास प्रतिबिंबीत करण्याचा प्रयत्न केला. सकल समाजाला एका रांगेत उभे करण्यासाठी आज विषमता दूर करण्याचा संदेश देणारे साहित्य निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठी काही लोकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र या कामात शासनाने सुद्धा योग्य धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची सुद्धा गरज आहे. समाजामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रभावाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्या चांगल्या वाईट गोष्टी दाखविल्या जातात त्यामधून आजची युवा पिढी वाईट कृतीचे जास्त अनुकरण करीत असते. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. माध्यमांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उषाकिरण आत्राम आपल्या लेखणीतून लेख, कथा, कविता इत्यादींची नेहमी निर्मिती करीत असतात.