शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

व्यक्तीची विद्वत्ताच नेहमीच कामी येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:40 IST

व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदिलीप मेश्राम : वार्षिक क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.पंचशील हायस्कुल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि. प. सदस्या लता दोनोडे, सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, ग्रा.पं.मक्काटोलाचे सरपंच रामप्रसाद दोनोडे, ग्रा. पं. कोटराच्या सरपंच मीरा नाईक, ग्रा.पं. कडोतीटोलाच्या सरपंच कल्पना मडावी, ग्रा.पं. गांधीटोलाचे सरपंच गजानन राणे, तंमुस अध्यक्ष पुरुषोत्तम कोरे, शाळा व्यवस्थापन समिती दुर्गूटोलाचे अध्यक्ष इशुलाल दोनोडे व प्राचार्य व्ही.डी. मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता शारदा माता, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. वार्षिक क्रीडा महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या खो-खो, कबड्डी, नृत्य व विविध सांस्कृतिक व बौद्धीक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आर. एम. मुनेश्वर यांनी केले.याप्रसंगी लता दोनोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाचन करुन वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. प्राचार्य मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून, देश सेवा करण्याचे आवाहन केले. संचालन शिक्षक एम. जी. कांबळे यांनी केले तर आभार प्रा. एम. जे. दिहारी यांनी मानले.