शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

इंदिरा गांधींचे जीवनच एक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 21:54 IST

लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : इंदिरा गांधी जन्मशताब्दी उत्सवाची सांगता, गांधी प्रतिमा चौकात सभा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : लहानपासूनच नेतृत्व गुणांना आत्मसात करून स्वातंत्र्याच्या युद्धात इंदिरा गांधींनी भाग घेतला. पाकिस्तानातून बांगला देश वेगळा करून स्वतंत्र देशाचा दर्जाचा मिळवून दिला. हुकूमशहासारखे शासन न करता त्यांनी लोकशाहीचा पाय भक्कम केला. आयर्न लेडीची ओळख असलेल्या इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीवन अर्पण केले असून त्यांचे जीवनच एक संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.इंदिरा गांधी जन्मशताद्बी उत्सव समितीच्यावतीने जिल्ह्याच्या भ्रमणावर निघालेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती यात्रेच्या समारोप समारंभानिमित्त रविवारी येथील गांधी प्रतिमा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यात्रेचे युवक कॉंग्रेस, एनएसयुआय व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी युवा नेता विशाल अग्रवाल, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप ठाकूर, एनएसयुआय अध्यक्ष संदीप रहांगडाले, शहर युवक अध्यक्ष नफीस सिद्धीकी यांच्या नेतृत्वात अदासी-तांडा येथे स्वागत करून मोटारसायकल रॅली काढून जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वात रॅली काढून शहराचे भ्रमण करीत रॅली सभा स्थळी पोहोचली.सभेत कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी, इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारताच्या विकासाची नवी कथा लिहिण्यात आली. पंडीत नेहरूंनी बनविलेल्या धोरणांना पुढे लागू करून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला गती दिली.त्यांनी घेतलेल्या पराक्रमी पवित्र्यामुळेच अमेरिकेसारखा शक्तीशाली देश त्यांना घाबरत असल्याचे सांगीतले. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी, इंदिरा गांधी यांची आजही देश आठवण करीत असून त्यांचा सारखा पंतप्रधान देशाला अद्यापही मिळाला नसल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे यांनी केले. संचालन शहर महासचिव व उत्सव समिती संयोजक अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार जिल्हा महासचिव अमर वराडे यांनी मानले.कार्यक्रमाला माजी आमदार रामरतन राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रदेश सचिव विनोद जैन, डॉ. योगेंद्र भगत, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, डॉ.नामदेव किरसान, महिला अध्यक्ष उषा सहारे, अनिल गौतम, महासचिव अशोक लंजे, सहेसराम कोरोटे, शेषराव गिरेपुंजे, राजेश नंदागवळी, पृथ्वीपालसिंह गुलाटी, राकेश ठाकूर, शकील मंसूरी, भागवत नाकाडे, डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे, रत्नदीप दहिवले यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारइंदिरा गांधी जन्मशताब्दी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, भाषण व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी आमदार अग्रवाल व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.