शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

दत्तक ग्राम योजनेत सदस्यांचीच उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 23:06 IST

सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव

गोंदिया : सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव पंचायत विभागाकडे द्यावयाचे होते. मात्र ५२ पैकी आतापर्यंत केवळ २० सदस्यांनी गावांचे नाव देऊन स्वच्छता अभियानाबद्दलच्या उदासीनतेचा परिचय दिला आहे. जे सदस्य स्वत:च उदासीन आहेत ते गावाला स्वच्छतेची सवय कशी लावणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.स्वच्छ भारत मिशन हे अभियान शहरांपुरतेच मर्यादीत न राहता यात लहानातील लहान गाव सहभागी होऊन प्रत्येक स्तरापर्यंत स्वच्छतेचा संदेश जावा हा उद्देश आहे. यातूनच या अभियानांतर्गत प्रत्येक खासदारांना एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे निर्देश देण्यात आले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेने देवरी येथे स्वच्छता अभियान राबविले व त्यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे ठरले. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील निवडण्यात आलेले गाव जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे कळविणे गरजेचे होते. मात्र कित्येक जिल्हा परिषद सदस्यांनी अद्याप गावांची नावे कळविलीच नसल्याची माहिती आहे. तर काही सदस्य सहलीसाठी बाहेरगावी निघून गेल्याचे ऐकीवात आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत जिल्ह परिषद अध्यक्षांनाही माहिती नसून विभागाकडे फक्त त्यांनी निवडलेल्या गावाची माहिती आहे. गावातील लोकप्रतिनिधी, संस्था व शाळांची मदत घेऊन त्या गावात अभियान राबवायचे आहे. मात्र येथे जिल्हाम परिषद सदस्य स्वत:च उदासिन असताना अभियानाचा फज्जा उडविला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच, सचिव, सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचे ठरले आहे. मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासिनतेमुळे या अभियानावरच प्रश्न लागले आहे. तर या गंभीर प्रकरणाला घेऊन पंचायत विभागातील एक कर्मचारी २८ नोव्हेंबर रोजी पत्र घेऊन जिल्हा परिषद सदस्यांकडे गेल्याचीही माहिती हाती लागली. अशात आता कसे तरी हे अभियान एकदाचे उरकून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)