शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

दत्तक ग्राम योजनेत सदस्यांचीच उदासीनता

By admin | Updated: November 30, 2014 23:06 IST

सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव

गोंदिया : सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांनी निवडलेल्या गावाचे नाव पंचायत विभागाकडे द्यावयाचे होते. मात्र ५२ पैकी आतापर्यंत केवळ २० सदस्यांनी गावांचे नाव देऊन स्वच्छता अभियानाबद्दलच्या उदासीनतेचा परिचय दिला आहे. जे सदस्य स्वत:च उदासीन आहेत ते गावाला स्वच्छतेची सवय कशी लावणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.स्वच्छ भारत मिशन हे अभियान शहरांपुरतेच मर्यादीत न राहता यात लहानातील लहान गाव सहभागी होऊन प्रत्येक स्तरापर्यंत स्वच्छतेचा संदेश जावा हा उद्देश आहे. यातूनच या अभियानांतर्गत प्रत्येक खासदारांना एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचे निर्देश देण्यात आले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेने देवरी येथे स्वच्छता अभियान राबविले व त्यावेळी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा असे ठरले. यासाठी २६ नोव्हेंबर पर्यंत सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील निवडण्यात आलेले गाव जिल्हा परिषद पंचायत विभागाकडे कळविणे गरजेचे होते. मात्र कित्येक जिल्हा परिषद सदस्यांनी अद्याप गावांची नावे कळविलीच नसल्याची माहिती आहे. तर काही सदस्य सहलीसाठी बाहेरगावी निघून गेल्याचे ऐकीवात आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत जिल्ह परिषद अध्यक्षांनाही माहिती नसून विभागाकडे फक्त त्यांनी निवडलेल्या गावाची माहिती आहे. गावातील लोकप्रतिनिधी, संस्था व शाळांची मदत घेऊन त्या गावात अभियान राबवायचे आहे. मात्र येथे जिल्हाम परिषद सदस्य स्वत:च उदासिन असताना अभियानाचा फज्जा उडविला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. विशेष म्हणजे या अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्राम पंचायत सरपंच, सचिव, सदस्यांसह जिल्हा परिषद सदस्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्याचे ठरले आहे. मात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासिनतेमुळे या अभियानावरच प्रश्न लागले आहे. तर या गंभीर प्रकरणाला घेऊन पंचायत विभागातील एक कर्मचारी २८ नोव्हेंबर रोजी पत्र घेऊन जिल्हा परिषद सदस्यांकडे गेल्याचीही माहिती हाती लागली. अशात आता कसे तरी हे अभियान एकदाचे उरकून घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)