शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

By admin | Updated: April 17, 2016 01:43 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत....

इटखेडा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिल २००६ पर्यंत ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पमाला अर्पण व अभिवादन करुन करण्यात आला.सरपंच अस्मिता वैद्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती उमाकांत ढेंगे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देशमुख, पोलीस पाटील विकास लांडगे, ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ गोठे, प्राचार्य पुंडलिक धोटे यांची उपस्थिती होती. ग्राम विकास अधिकारी मेश्राम यांनी या अभियानाची पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली. या निमित्याने उपस्थितांनी सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. या अभियानांतर्गत सामाजिक सलोखा वा अभिसरण कार्यक्रम, ग्राम किसान सभा, आदिवासी महिला सरपंच मेळावा, ग्रामसभेचे आयोजन व ग्रामसभेस पंतप्रधानांचे संबोधन ऐकविणे इत्यादी कार्यवाही अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, सदस्य चेतन शेंडे, सरिता सुखदेवे, तारा वैद्य, पुष्पा उके, सुषमा गोंडाणे, संगीता गोंडाणे, देवराम मडावी, विनोद ठाकूर, घनशाम गोठे, शोभा मडावी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)विजेचा लपंडावसडक अर्जुनी : सडक अर्जुनी, कोहमारा, वडेगाव, कोकणा/जमि., सौंदड परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीला वीज जाणे आता नित्याचीच बाब बनली आहे. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना या विजेच्या लपंडावाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)