शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

By admin | Updated: April 17, 2016 01:43 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत....

इटखेडा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिल २००६ पर्यंत ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पमाला अर्पण व अभिवादन करुन करण्यात आला.सरपंच अस्मिता वैद्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती उमाकांत ढेंगे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देशमुख, पोलीस पाटील विकास लांडगे, ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ गोठे, प्राचार्य पुंडलिक धोटे यांची उपस्थिती होती. ग्राम विकास अधिकारी मेश्राम यांनी या अभियानाची पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली. या निमित्याने उपस्थितांनी सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. या अभियानांतर्गत सामाजिक सलोखा वा अभिसरण कार्यक्रम, ग्राम किसान सभा, आदिवासी महिला सरपंच मेळावा, ग्रामसभेचे आयोजन व ग्रामसभेस पंतप्रधानांचे संबोधन ऐकविणे इत्यादी कार्यवाही अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, सदस्य चेतन शेंडे, सरिता सुखदेवे, तारा वैद्य, पुष्पा उके, सुषमा गोंडाणे, संगीता गोंडाणे, देवराम मडावी, विनोद ठाकूर, घनशाम गोठे, शोभा मडावी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)विजेचा लपंडावसडक अर्जुनी : सडक अर्जुनी, कोहमारा, वडेगाव, कोकणा/जमि., सौंदड परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीला वीज जाणे आता नित्याचीच बाब बनली आहे. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना या विजेच्या लपंडावाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)