शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अतिक्रमण धोकादायक

By admin | Updated: January 11, 2017 02:00 IST

आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर व्यावसायिकांनी केलेले अधिकचे अतिक्रमण वाहनधारक

मार्गक्रमणाला अडचण : सार्वजनिक बांधकाम विभाग निष्क्रिय आमगाव : आमगाव शहरातील मुख्य राज्य मार्गावर व्यावसायिकांनी केलेले अधिकचे अतिक्रमण वाहनधारक व पायदळ मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजवत आहे. व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाकडे वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील प्रमुख केंद्र आमगाव असून शहरातील विविध उद्योग, व्यवसाय, शिक्षणकार्य, प्रशासनातील विविध महत्वामुळे संपूर्ण विभागाची कार्यालये नागरिकांसाठी नेहमीच वर्दळीचे ठरले आहेत. आमगाव शहर कामठा, सालेकसा, देवरी व गोंदिया या राज्यमार्गाने जोडला आहे. याच राज्यमार्गाचे सीमाक्षेत्र छत्तीसगड-मध्य प्रदेश राज्यमार्ग वाहतुकीचे असल्याने शहरातील मध्यभागातून वाहनांची वर्दळ नित्याचीच बाब ठरली आहे. वाढत्या वाहनांच्या गर्दीला पुरक रस्ते उपलब्ध आहेत. तर पायदळ मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध आहे. परंतु शहरातील राज्य मार्गावर व्यावसायिकांनी, फुटकर विक्रेत्यांनी अतिक्रमण वाढवले आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे राज्यमार्गावरील वाहतूक निरंतर धोक्याची ठरली आहे. अतिक्रमणे रस्त्यावर आल्याने पादचारी रस्ते व राज्यमार्ग ये-जासाठी अडचणीचे ठरले आहेत. शहरातील कामठा चौक, गांधी चौक, मानकर गुरूजी चौक, आंबेडकर चौक, पंचायत समिती मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती मार्ग, नटराज मार्ग व गोंदिया-देवरी राज्यमार्ग यावर अतिक्रमणाच्या वाढीने व वाहनांच्या वर्दळीने वाहतूक खंडित होत चालली आहे. नागरिकांना पायदळ चालण्यासाठी असलेल्या फुटपाथ मार्गावर अतिकमण झाल्याने वाहनांच्या वर्दळीतून मार्ग काढत चालण्यासाठी भाग पडावे लागते. शहरातील वाढत्या अतिक्रमणाला पायबंध घालण्यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील महसूल विभाग या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळ्य व्यावसायिक व फुटकर दुकानदार अतिक्रमण करावयास मोकळे ठरले आहेत. राज्यमार्गावरून धावणाऱ्या वाहनांना वाहतुकीची अडचण निर्माण होवू नये यासाठी वाहतूक पोलीस विभागाने दखल घेणे गरजेचे आहे. परंतु विभागाची अकार्यक्षमता वाहतूक नियमांचा बोजवारा उडवित आहे. राज्यमार्गावर अतिक्रमण व वाहनांची कोंडी पादचारी नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. परंतु संबंधित प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नसल्याने वाढत्या अपघातांना वाव मिळत आहे.(शहर प्रतिनिधी)