शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील वाढीव पाणी पुरवठा नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:30 IST

आमगाव : नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील पाणी पुरवठा योजना कालबाह्य ठरली असून, वाढीव पाणी पुरवठा योजना ...

आमगाव : नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील पाणी पुरवठा योजना कालबाह्य ठरली असून, वाढीव पाणी पुरवठा योजना नियोजन शून्य असल्यामुळे आजही अनेक लोकवस्ती, नगरे तहानलेली आहेत.

आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील पाणी पुरवठा योजना नियोजितपणे प्रस्तावित होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. आठ गावातील पस्तीस हजार लोकसंख्येच्या प्रमाणात तेरा लाख पस्तीस हजार पाणीसाठा व पुरवठा उपलब्धता आहे. पाणी साठवण क्षमता असलेल्या पाण्याच्या एकूण नऊ टाक्या आहेत. यात बिरसी या गावात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी टाकीच उभारण्यात आली नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी कुंभारटोली या गावातून पाण्याची पूर्तता करण्यात येत आहे. नगर परिषद परिक्षेत्रातील गाव पातळीवर नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी मागणीपेक्षा पाणी साठवण क्षमता व पुरवठा कमी होत आहे. आमगाव येथील परिक्षेत्रातील प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी दोन लाख पन्नास हजार लीटर क्षमता असलेली जलकुंभ आहे. परंतु मागणीपेक्षा कमी पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. विविध प्रभागातील मोहनटोला, बेदाडी, पाॅवर हाऊस, समोदेमो, इश्वर धाम, महाजन नगर या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी जल वाहिनी टाकण्यात आली नाही. अपुरा पाणीसाठा असल्यामुळे पुरवठ्याचा प्रश्न आहे. यामुळे पाण्याअभावी या भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. नगर परिषदेकडे पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नागरिक तहानलेले दिसून येत आहेत.

......

पाण्याच्या टाकीची आवश्यकता

किडगींपार येथील प्रभागातील बोथली मार्ग, जावई टोली, जुनी वस्तीत जलवाहिनी टाकण्यात आली नाही. त्यामुळे येथील नागरिक पाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. कुंभारटोली प्रभागातील इंदिरा आवास, राजयोग कॉलनी, ग्रामीण रुग्णालय परिसर, महादेव पहाडी, बिरसी मार्ग परिसरात जलवाहिनीअभावी व कमी क्षमता असलेल्या पाणीसाठ्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्यात येत नाही. रिसामा येथील प्रभागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या दोन टाक्या आहेत. यातील एक टाकी जीर्ण अवस्थेत आहे. रेणुका नगर, साव नगर, संकल्प, प्रगती नगर, सिव्हील लाईन, रेल्वे स्टेशन परिसरात जलवाहिनीसह नवीन पाणीसाठा जलकुंभाची आवश्यकता आहे.

.....

जलवाहिनीचे नियोजन आवश्यक

बनगाव येथील प्रभागातील यशवंतनगर, इंद्रप्रस्थ, नितीननगर, द्वारकाधाम, किडंगीपार मार्ग येथील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी क्षमता असलेले जलकुंभ नसल्यामुळे पुरवठाच होत नाही. जलवाहिनी टाकण्यासाठी नियोजन प्रस्ताव मंजूर केला जात नाही. माली प्रभागातील सावनटोली, गारपगारी टोली या लोकवस्तीत पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाणी टाकी व जलवाहिनीची मागणी केली आहे. येथील एक पाणी टाकी जीर्ण अवस्थेत पदमपूर प्रभागातील पोवारीटोला, भवभूती नगर येथे जलवाहिनीची आवश्यकता आहे.