शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्त्यावरील चुरीने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:23 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रस्ता डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले. परिणामी चुरीवरुन वाहन घसरून अपघात घडत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ते सालईटोला गावाचे अंतर १३ किमी आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले व त्यावर चुरी टाकण्यात आली परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. परिणामी वाहन घसरुन अपघात घडत आहेत. शिवाय वाहन पंक्चर होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. सालईटोला ते शेंडा, कोयलारी, पुतळीपासून महामार्ग क्रं. ६ या रस्त्याची अवस्था चांगली असताना त्याच रस्त्याला डांबरीकरण करण्याची लगीन घाई सार्वजनिक बांधकाम विभागाला का? गावकऱ्यांच्या समजण्या पलिकडे आहे. याच मार्गाला जोडणाºया शेंडा ते सडक -अर्जुनी मार्गाची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नव्हे तर चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले गेले. यावरुन विविध चर्चेला ऊत आला आहे.शेंडा ते उशीखेडा या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट आहे. वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून या मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील गावकºयांनी अनेकदा केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. यावरुन सां. बा. विभागाच्या काम करण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.हा परिसर आदिवासी बहुल नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या परिसरातील विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष केले जाते अशी ओरड आहे. याचे उदाहरण म्हणजे दोन महिन्यांपासून रस्त्यावर चुरी टाकून डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र दुर्दशा झालेल्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चुरी हटवून डांबरीकरण करण्यात यावे तसेच शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी गावकºयांची आहे.