शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील चुरीने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:23 IST

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : रस्ता डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ते सालईटोला गावापर्यंत डांबरीकरण मार्गाचे काम दोन महिन्यापुर्वी सरू करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण न करता नुसते खडीकरण करुन त्यावर चुरी टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले. परिणामी चुरीवरुन वाहन घसरून अपघात घडत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ ते सालईटोला गावाचे अंतर १३ किमी आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले व त्यावर चुरी टाकण्यात आली परंतु दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. परिणामी वाहन घसरुन अपघात घडत आहेत. शिवाय वाहन पंक्चर होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. सालईटोला ते शेंडा, कोयलारी, पुतळीपासून महामार्ग क्रं. ६ या रस्त्याची अवस्था चांगली असताना त्याच रस्त्याला डांबरीकरण करण्याची लगीन घाई सार्वजनिक बांधकाम विभागाला का? गावकऱ्यांच्या समजण्या पलिकडे आहे. याच मार्गाला जोडणाºया शेंडा ते सडक -अर्जुनी मार्गाची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नव्हे तर चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले गेले. यावरुन विविध चर्चेला ऊत आला आहे.शेंडा ते उशीखेडा या पाच किलोमीटर रस्त्याची अवस्था अधिकच बिकट आहे. वाहन चालकांना जीव धोक्यात टाकून या मार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील गावकºयांनी अनेकदा केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. यावरुन सां. बा. विभागाच्या काम करण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.हा परिसर आदिवासी बहुल नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या परिसरातील विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष केले जाते अशी ओरड आहे. याचे उदाहरण म्हणजे दोन महिन्यांपासून रस्त्यावर चुरी टाकून डांबरीकरणाला सुरुवातच झाली नाही. त्याचप्रमाणे चांगल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र दुर्दशा झालेल्या मार्गाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने चुरी हटवून डांबरीकरण करण्यात यावे तसेच शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे नव्याने डांबरीकरण करावे अशी मागणी गावकºयांची आहे.