शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

रजेगाव-काटी उपसा सिंचन लाभक्षेत्रात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:49 IST

रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देयोजना : मंत्रालयात विशेष आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत रजेगाव व काटी मायनरवर येत असलेल्या गावांना रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत आमदार अग्रवाल यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेसह नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेसाठी राज्यपालांची विशेष मंजूरी मिळाली असल्याचे सांगत योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात सिंचन विभाग ढिलाई करीत असल्याचे सांगीतले. तसेच तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेच्या अंतीम टप्प्यात सुरू असलेल्या कामालाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी सचिवांकडे केली. शिवाय डांगोरली येथे प्रस्तावीत बॅरेजसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी बैठकीत दिली.तसेच आता या बॅरेजला लवकरात लवकर मंजूरी मिळावी यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी सचिवांना विनंती केली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवरील चर्चेनंतर सचिवांनी प्रस्तावीत रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राच्या विस्ताराला मंजुरी देत विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांना निर्देश दिले. शिवाय अन्य विषयांवरही त्वरीत कारवाई करण्याबाबत संबंधीतांना निर्देश देण्यात आले.यामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण योजनांना गती मिळून येणाºया वर्षात योजनांच्या लाभक्षेत्रात सुमारे २० हजार एकर पर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज आ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.