शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी सहभाग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:04 IST

सत्तेत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यातच जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची भर पडली आहे.

ठळक मुद्देराजेंद्र जैन यांचे आवाहन : गोंदिया जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सत्तेत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यातच जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. राज्य आणि केंद्र शासनाने शेतकºयांना मदत करावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून सरकार कडून शेतकºयांना न्याय मिळेल यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. माजी आमदार दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, अशोक गुप्ता, केतन तुरकर, रमेश ताराम प्रामुख्याने उपस्थित होते.रविवारी जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकºयांची कर्ज माफी, पंतप्रधान पिक विमा योजना, पक्ष संगठन या विषयावर चर्चा करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित जिल्ह्यातील प्रत्येक तालुका राष्टÑवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील शेतकºयांची कर्जमाफी, पंतप्रधान पिक विमा योजना, तालुक्यात निर्माण झालेली दृष्काळी परिस्थिती आणि पक्ष संघटन यावर आपले विचार व्यक्त केले. सर्व तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी कर्जमाफी, पिक विमा योजना, दुष्काळी परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, शासनाकडून कर्जमाफी आणि पीक विमा योजनेत शेतकºयांची दिशाभूल झाल्याने शासनाचा निषेध हे ठराव पारित करण्यात आले. सोबतच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा अशा त्यांना विनंती करणारा ठरावही पारीत करण्यात आला. यासभेमध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुकास्तरावर दुष्काळ संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्याचे ठरविण्यात आले.याप्रसंगी बोलताना माजी आ. जैन यांनी, जिल्ह्यातील शेतकºयांना कर्ज माफी बाबत होत असलेली अडचण, पीक विमा काढताना शेतकºयांची झालेली परवड, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयावर ओढवलेले संकट हे सर्व पाहता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या गावागावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या, शेतमजूरांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मदत मिळवून दिली पाहिजे असे आवाहन केले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्ष पदाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यात दौरे करुन संपूर्ण माहिती गोळा करावी त्या नंतर सविस्तर अहवाल तयार करुन तो शासनाला सादर करुन शेतकºयांच्या मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडू असे ठरविण्यात आले.बैठकीत अशोक सहारे, शिव शर्मा, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, राजू एन. जैन, प्रेम रहांगडाले, कमल बहेकार, नामदेव डोंगरवार, छोटू पटले, कुंदन कटारे, उषा किंदरले, सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, सुरेश हर्षे, ललीता चौरागडे, भाष्कर आत्राम, रमेश चुºहे, मनोज डोंगरे, दुर्गा तिराले, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, विणा बिसेन, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, कैलास पटले, राजेश भक्तवर्ती, छाया चव्हाण, रीता लांजेवार, रजनी गिºहेपुंजे, विनीत सहारे, राजेश दवे, नानू मुदलीयार, टिकाराम मेंढे, बंडू भेंडारकर, तुकाराम बोहरे, केदार चव्हण, किशोर पारधी, नरेश कुंभारे, दिलीप कापगते, खालीद पठान, गोपाल तिवारी, उद्धव मेहेंदळे, मनोज दहीकर, सी.के. बिसेन, जितेश टेंभरे, डुमेश चौरागडे, आशा पाटील, लता रहांगडाले, विनायक खैरे, तुंडीलाल कटरे, तिर्थराज हरिनखेडे, पुरनलाल उके, योगेश (मामा) बन्सोड, गणेश बरडे, शैलेष वासनिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.