शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

बसस्थानकावर गैरसोयी

By admin | Updated: August 30, 2015 01:41 IST

सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत.

जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही : मंत्र्यांच्या हस्ते झाला होता स्थानकाचा शुभारंभअर्जुनी मोरगाव : सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत. बससेवेच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयाशी या तालुक्याची नाळ जुळलेली नाही. अख्ख्या राज्यात असा एकमेव तालुका असावा अशी शंका प्रवासी व्यक्त करीत आहेत.स्थानिक बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा १७ जानेवारी रोजी संपन्न झाला. सर्व सुविधायुक्त बसस्थानक राहील अशी मुक्ताफळे उधळण्यात आली. मात्र येथे अनेक गैरसोयी आहेत. बसस्थानकावर सुलभ शौचालय नाही. चौकशी नियंत्रण कक्षात दुरध्वनी नाही. एकाच कर्मचाऱ्याच्या भरवशावर नियंत्रण कक्षाचा कारभार सुरू आहे. उपहार गृह अद्यापही सुरू करण्यात आले नाही. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक मोठ्या गावांसाठी थेट बससेवा उपलब्ध नाहीत. अशा नानाविध समस्या आहेत. बस आगाराची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी व राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष आहे.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका वैविधतेने नटलेला आहे. या तालुक्यात राष्ट्रीय उद्यान आहे. इटियाडोह धरण आहे. शिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असलेली एकमेव तिबेटीयन वसाहत आहे. हा तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वे व बससुविधा आहे. रेल्वेने या तालुक्याची नाळ जुडलेली असली तरी बससेवेच्या बाबतीत हा तालुका संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. या तालुक्यातील अनेक कर्मचारी दैनंदिन जिल्हा मुख्यालयात ये-जा करतात. मात्र सकाळच्या सत्रात रेल्वे व बससुविधा उपलब्ध नसल्यामुळे वळसा घालून साकोलीमार्गे १०० पेक्षा अधिक किलोमिटरचा प्रवास करवा लागतो. काही काळापूरती बससेवा उपलब्ध केली जाते मात्र अल्पावधीतच बंद केली जाते. कोहमारा ते अर्जुनी मोरगाव अशी दिवसभर फेरी घालणारी शटल बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांना सोईचे होऊ शकते. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. या जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले सडक अर्जुनी तालुक्यातील आहेत. मात्र या ठिकाणी बससेवेचा थेट संपर्क नाही. या तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोली (भरनोली) येथे केवळ दोन बसफेऱ्या आहेत. तर झाशीनगर व केशोरी येथे थेट बससेवा नाही. सकाळची महागाव-नागपूर बस बंद करण्यात आली. नागपूरसाठी केवळ प्रतापगड व लाखांदूर मार्गे एक फेरी आहे.बसस्थानकाला आठ महिन्याचा कालावधी झाला मात्र येथील समस्य अजूनही कायम आहेत. मंत्री नेहमीप्रमाणे भाषण देऊन मोकळे झाले मात्र जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)राजकारण्यांचे काय?१७ जानेवारी रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव-यवतमाळ बससेवा सुरू करुन हिरवी झेंडी दाखविली. या कार्यक्रमात हजारो लोक उपस्थित होती. ही बस सेवाच महामंडळाने बंद केली. यापूर्वी या भागाचे आ. नाना पटोले हे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिर्डी व पंढरपूर या लांब पल्ल्याच्या बससेवा अर्जुनी मोरगाव येथून सुरू केल्या होत्या. वर्षभराचे आतच या बससेवा बंद करण्यात आल्या. एकंदरित राजकारण्यांनी सुरू केलेल्या बससेवा क्षणिक असतात. अल्पवधीतच त्या बंद होतात हे कटूसत्य आहे. या पाठीमागे त्यांचा स्वार्थच असतो असा सूर सामान्य जनतेत उमटत आहे.