शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातवरुन परतलेल्या २१ तरुणींची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २१ तरुणी गुजरात येथील विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे तेथील कंपन्या बंद असल्याने त्यांचा रोजगार सुध्दा बंद होता. तर लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या तरुणींचे कुटुंबीय सुध्दा चिंतेत होते. त्यामुळे या तरुणींनी आपल्या स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला मदतीचा विसर : सामाजिक संस्थांनी केली जेवणाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी देशभरातील उद्योगधंदे बंदे असल्याने तिथे असलेले जिल्ह्यातील नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. रविवारी (दि.१७) सकाळी गुजरात येथून एसटी बसने गोंदिया येथे पोहचलेल्या तरुणींना स्थानिक प्रशासनाची कुठलीच मदत न मिळाल्याने त्यांची गैरसोय झाली.गोंदिया जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २१ तरुणी गुजरात येथील विविध कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे तेथील कंपन्या बंद असल्याने त्यांचा रोजगार सुध्दा बंद होता. तर लॉकडाऊनमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या तरुणींचे कुटुंबीय सुध्दा चिंतेत होते. त्यामुळे या तरुणींनी आपल्या स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली.परवानगी मिळाल्यानंतर या सर्व २१ तरुणी बसने १५ मे रोजी गुजरात नवापूर येथून गोंदियासाठी रवाना झाल्या. यानंतर त्या रविवारी सकाळी ७ वाजता गोंदिया येथील बस स्थानकावर पोहचल्या.येथे पोहचल्यानंतर या तरुणींना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी अथवा त्यांची विचारपूस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी पोहचला नाही. त्यामुळे या तरुणी सकाळपासून तशाच उपाशी तापाशी उन्हात बसस्थानकावर उभ्या होत्या.ही बाब काही स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर गोंदिया येथील सामाजिक संस्थेतर्फे त्यांच्या नास्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक तहसील प्रशासनाला फोनवरुन याप्रकाराची माहिती दिल्यानंतर अधिकारी बसस्थानकावर पोहचले आणि त्यानंतर या तरुणींना बसेस त्यांच्या गावाला सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र यासर्व प्रकारामुळे गुजरातवरुन परतलेल्या या २१ तरुणींची प्रचंड गैरसोय झाली.प्रशासनाच्या मदतीच्या दाव्यात किती तथ्यबाहेर जिल्ह्यात आणि राज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. तसेच विविध जिल्ह्यातून बसने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी मदत केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र रविवारी सकाळी गुजरातवरुन जिल्ह्यात परतलेल्या तरुणींची झालेली गैरसोय पाहता प्रशासनाच्या मदतीच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे देखील दिसून आले.स्थलांतरितांना स्वयंसेवी संस्थांचीच मदतशासन व प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी बसेस आणि रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अजुनही स्थलांतरित मजुरांचे लोंढे पायीच आपल्या गावाकडे परतत आहे. रविवारी सुध्दा जिल्ह्यातून स्थलांतरित मजूर आपल्या गावाकडे जातांना पाहयला मिळाले. या मजुरांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थाकडून अन्नदान केले जात होते. त्यामुळे स्थलांतरितांना स्वयंसेवी संस्थाचीच मदत होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या