शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

धानाच्या हमीभावात तुटपुंजी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:58 IST

मागील पाच वर्षांत सरकारने धानाच्या हमीभावात केवळ २५३ रुपयांनी वाढ केली आहे. तर त्यातुलनेत धानाच्या लागवड खर्चात प्रती हेक्टरीे पाच ते सहा पट वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हमीभावात फार कमी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केली जात आहे.

ठळक मुद्देपाच वर्षात केवळ २५३ रुपये वाढलागवड खर्च मात्र दुप्पटीने वाढला

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२०-२१ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात ५३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रती क्विंटल अ ग्रेड धानाला १८८८ तर सर्वसाधारण धानाला १८६८ रुपये दर मिळणार आहे. मात्र मागील पाच वर्षांत सरकारने धानाच्या हमीभावात केवळ २५३ रुपयांनी वाढ केली आहे. तर त्यातुलनेत धानाच्या लागवड खर्चात प्रती हेक्टरीे पाच ते सहा पट वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हमीभावात फार कमी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केली जात आहे.पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची उत्पादन घेतले जाते.त्यामुळे या जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. दिवसेंदिवस धानाच्या लागवड खर्चात सातत्याने वाढ होत आहे. सध्या धानाचा प्रती एकरी लागवड खर्च २० ते २५ हजार रुपये येतो. त्यातून १८ ते २२ क्विंटल धानाचे उत्पादन होते. सर्व खर्च जाता शेतकऱ्यांच्या हातात केवळ तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहते. त्यातच मागील तीन चार वर्षांपासून शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. तर शेतकऱ्यांनी कुटुंबासह शेतीसाठी केलेली मेहनत आणि मजुरी जोडल्यास त्यांच्या हाती काहीच पडत नाही. केंद्र सरकारला सुध्दा शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नसल्याचे धानाच्या हमीभावात केवळ ५३ रुपये वाढ करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांपासून धानाला प्रती क्विंटल २२०० ते २५०० रुपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. केंद्रातील सत्तारुढ सरकारने शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट भाव देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीे केली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी धानाच्या हमीभावात केवळ ५३ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खरीपातील धानाचा प्रती क्विंटल दर आता १८६८ रुपये मिळणार आहे. मात्र त्यातुलनेत खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरी, डिझेलच्या दरात पाचपट वाढ झाली आहे. त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस तोट्याचा सौदा होत चालला आहे. ज्या तुलनेत धानाच्या लागवड खर्चात वाढ होत आहे. त्यातुलनेत धानाच्या हमीभाव वाढत नसल्याचे चित्र आहे. परिणामी धान उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस दुबळा होत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता केंद्र सरकारने धानाला प्रती क्विंटल दर २५०० ते ३ हजार रुपये जाहीर करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.मोदी सरकारने धानाच्या हमीभावात केलेली दरवाढ ही २०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली होती. मात्र आता पुढील चार वर्षे निवडणुका नाही. त्यामुळेच धानाच्या हमीभावात ५३ रुपयांची मोजकी भाववाढ केली आहे. या हमीभावाची तुलना मनमोहनसिंग सरकारच्या काळात झालेल्या दरवाढीशी केल्यास ही भाववाढ फार कमी आहे. मोदी सरकारने हमीभावात केलेली दरवाढ जाहीर करताना यात शेतकरी आणि शेतमजुराची मजुरी किती गृहीत धरली हे सुध्दा जाहीर करायला हवे होते.- विजय जावंधिया,शेतकरी नेते तथा कृषी तज्ज्ञ.

धानाच्या लागवड खर्चात मागील पाच वर्षात पाचपट वाढ झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुध्दा वाढ झाल्याने त्याचा सुध्दा परिणाम लागवड खर्चावर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेली दरवाढ ही नाममात्र असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.- गंगाधर परशुरामकर,जि.प.सदस्य.

टॅग्स :agricultureशेती