शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ज्ञान प्राप्तिसाठी शालेय वाचनालयांना महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:00 IST

पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.

ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : सध्याचे युग संगणकाचे आहे. प्रचलीत शासकीय धोरणानुसार भविष्यात स्थिर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्याची पूर्व तयारी शालेय जिवनापासूनच होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सखोल ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक शाळेत सुसज्ज वाचानालय उपलब्ध असणे गरजेचे आहे. कारण, सखोल ज्ञान प्राप्तीसाठी शालेय वाचनालयांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयांतर्गत हे वाचनालय परशुरामकर यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्थेचे सचिव एन.एन.येळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समीती उपसभापती राजेश कठाणे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष छाया चव्हाण, भंडारा जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, सरपंच सत्यशीला गायकवाड, प्राचार्य खुशाल कटरे, उपसरपंच नरेंद्र देहारी, पर्यवेक्षक आर.के.कटरे, उमावि प्रभारी प्रा.योगराज परशुरामकर, माजी उपसरपंच उमराव मांढरे यांच्यासह सर्व शालेय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बोपचे यांनी, कोणत्याही विषयाची माहिती व ज्ञान यात फरक असतो. माहिती इतर माध्यमातून प्राप्त होण्यासाठी संधी उपलब्ध आहे. परंतु विषयाचे सखोल ज्ञान वाचनालयात उपलब्ध ग्रंथांमधूनच शक्य असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक प्राचार्य कटरे यांनी मांडले. संचालन सहायक शिक्षक जि.टी.लंजे यांनी केले. आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.डी.रंहागडाले, सी.एस.ब्राम्हणकर, प्रा.सुरज रामटेके, ए.डी.मेश्राम, व्हि.एस.राठोड, आर.यु.गौतम यांनी सहकार्य केले.

टॅग्स :libraryवाचनालय