शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

अर्जुनी चांदोरी खुर्द मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:59 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनव्याने डांबरीकरणाची मागणी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या १२ कि.मी. अंतराच्या मार्गाची दुर्दशा झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांची समस्या कायम आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुख्य मार्ग १५ डिसेंबरपर्यत खड्डे मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटील यांची घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे. तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया-चांदोरी खुर्द- बघोली या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्री ९.३० वाजेपर्यंत या मार्गावर रहदारी सुरू असते. अर्जुनी ते चांदोरी खुर्द ९ कि.मी. अंतराचा मार्ग पूर्णत: उखडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता पूर्णत: उखडला असल्याने या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर या मार्गावर अपघात होवून काही वाहन चालकांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती. मागील दोन वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत सावरा येथे २ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण त्याही रस्त्याचे तिनतेरा वाजले आहे. या रस्त्याने रेतीघाट असल्याने ट्रकची मोठी वर्दळ असते. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. अशातच रस्ता उखडल्याने वाहन कोणत्या बाजूने न्यावे असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. हा परिसर तालुक्याचा शेवटच्या टोकावर आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. या मार्गावर काही ठिकाणी कामे सुरू करण्यात आले होते. मात्र ते देखील सध्या अर्धवट असल्याचे चित्र आहे.अर्जुनी ते चांदोरी, बिहिरीया, इंदोरा बुज. मार्गाचे सर्व्हेक्षण नियोजनात असल्याचे २० वर्षापासून अधिकारी सांगतात. मात्र अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे कायम आहेत.