शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध वाहतूक

By admin | Updated: August 6, 2014 23:54 IST

जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.

गोंदिया : जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र त्यापैकी केवळ २०० च्या आसपास गाड्यांनीच ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेतले आहे. परवाना न घेताच भंगाराच्या काढण्यासारख्या गाड्या बेधडकपणे धावत असल्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.अडीच वर्षांपूर्वी तिरोडा तालुक्यात काळीपिवळी जीपला झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवाशांचा बळी गेला होता. त्या अपघातानंतर जिल्ह्यात काळीपिवळी प्रवासी वाहतुकीवर कडक निर्बंध लावले होते. जर प्रवासी वाहतूक करायची असेल तर परवान्यात नमूद केल्याप्रमाणे (पाच अधिक एक) प्रवासी भरावे लागतील, असे सांगून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. केवळ पाच प्रवाशांना घेऊन जाणे परवडणारे नसल्यामुळे नंतर वर्षभर काळीपिवळी गाड्या बंद होत्या. मात्र नंतर घरगुती वापराच्या गाड्यांसाठी मिळणाऱ्या परवान्याप्रमाणे प्रवासी गाड्यांनाही ९ अधिक १ प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अखेर नागपूर परिक्षेत्रातील सर्व काळीपिवळी गाड्यांना ९ अधिक १ चा परवाना देण्यात आला. परंतू गेल्या काही महिन्यात काळीपिवळी चालकांनी यापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे. गाडीत कितीही प्रवासी कोंबा, पण गाडीच्या बाहेर कोणीही लटकू नका, असे सांगत काळीपिवळी चालकांना देण्यात आलेली सूट पाहता कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसात काळीपिवळी जीप व इतर प्रवासी वाहनांची संख्या बरीच वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना आता या काळीपिवळी वाहनांनी व्यापून टाकले आहे. प्रत्येक रहदारीच्या मार्गावर काळापिवळा रंग दिलेली प्रवासी वाहने धावताना दिसतात. गोंदिया शहरात तर या गाड्यांमध्ये प्रवाशांना घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते.त्यातूनच ही वाहने भरधाव वेगाने निघतात. आधीच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यातच भरधाव वेगाने गाडी हाकण्याच्या प्रकारामुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन व पोलीस विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)