शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नदीपात्रालगतचा रेतीचा अवैध साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:23 IST

तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : रेतीमाफिया सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोहळीटोला चिखली येथील रेती साठा जप्त केला. त्यानंतर या रेती साठ्याचा रविवारी (दि.६) लिलाव करण्यात आल्याची माहिती आहे.या रेतीसाठ्याची लिलाव प्रक्रिया थांबवून चौकशी करुन अवैध उत्खनन करणाºयावर कारवाही करण्याची मागणीही चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे अवैध उत्खनन रात्रीच्या वेळेस करुन त्याची तस्करी केली जात होत होती. तसेच रेतीमाफीया दिवसा नदी पात्रातील रेतीचा उपसा करुन तो नदीपात्रालगत ढिग तयार करुन ठेवीत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या रेतीची तस्करी केली जात होते. पिपरीघाट, सौंदड, राका या घाटावर हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याबाबतची तक्रार संबंधित विभागाकडे करुन सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नव्हती. विशेष म्हणजे नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीसाठा जमा करुन ठेवण्यात आला असताना त्याची साधी चौकशी करण्याचे धाडस सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी दाखविले नव्हते. तर तक्रारीनंतर सदर रेतीसाठा जप्त करुन ती लावारीस दाखविण्यात आली. तालुक्यातील सर्व रेती घाटांची पाहणी करून तिथे जमा करुन ठेवण्यात आलेल्या अवैध रेतीसाठ्याची चौकशी करुन दोषीवर कारवाही करुन दंड वसुल करण्याची मागणी चंद्रिकापुरे यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्षजिल्ह्यातील अवैध रेती तस्करीच्या प्रकाराला पूर्णपणे आळा घालण्याठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बैठक घेवून एक समिती गठीत केली होती. तसेच रेती तस्करीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीे व कर्मचाºयांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.तपासणी नाक्याचे काय?रेती तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर दक्षता समित्या व काही ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात येणार होते. मात्र जिल्ह्यात रेती तस्करीचा प्रकार सुरूच असल्याने या तपासणी नाक्याचे काय झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे.