शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 21, 2016 01:54 IST

कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही.

शासन व शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेक : कृषी विभागाला भ्रष्टाचाराचे गालबोटकाचेवानी : कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही. आजघडीला सर्वाधिक मालदार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी दिसून येतात.कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकरी व शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून स्वार्थहित कसा साधला, हे सध्या गोरेगाव कृषी तालुक्यांतर्गत चोपा मंडळ कृषी कार्यालयात बोटे येथे कार्यरत आणि २०१५ मध्ये कामे करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर आलेले एन.एस. ईलमे यांच्या दैनिक कार्यावरुन दिसून येते.माहिती अधिकाराखाली प्राप्त दैनंदिनी कामकाजावरुन कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव शेततळी आणि शासनाला चुकीचे कामे दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. कामाचे दिवस चुकीचे दाखविणे, शेतकऱ्यांसमक्ष कामाच्यापूर्वी व नंतर मोजमाप न करता दाखवणे, गोरेगाव व तिरोड्याचे काम पाहणे, कामे सोडून प्रवास रजा सवलत (एल.टी.सी.) दाखवून शासनाकडून लाभ घेणे, प्रतिनियुक्ती ठिकानातून सतत अनुपस्थित राहणे, चार लाख रुपयांची कामे एकाच दिवशी पूर्ण केल्याचे सांगणे, अशा अनेक बाबी आहेत. त्यावरून कृषी सहायक एन.एस. इलमे यांनी सर्वांशी धोकाधडी करुन फसवणूक केल्याचे दिसून येते.बसबसपुरा येथे १०७-९४ हे.आर.मध्ये १७ लाख २२ हजार ६४३ रुपयांचे काम दाखविण्यात आले आहेत. माहिती अधिकारात अपूर्ण माहिती मिळाली असली तरी अपूर्ण माहितीकरिता राज्य आयोगाला अपिल करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांनी (जी.क्र/उविक्रअ कृसप्रतिनियुक्ती/११३/२०१५ दिनांक २७/१/२०१५) विविध योजनांच्या अल्प प्रगतीचा विचार करता कार्यालयीन व क्षेत्रीय कामे पूर्ण करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी २ मार्च २०१५ ला क्षेत्रीय कामे करण्याकरिता कार्यमुक्त केले. १२ जून २०१५ ला आदेश (क्र.६३३/२०१५) गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी कामाची अडचण पाहता तात्काळ रुजू होण्यास कळविले.कृषी सहायक नाना ईलमे यांनी स्वत:च्या मर्जीने १२ जून २०१५ ला गोरेगाव कार्यालयात रुजू झाले. तिरोड्यातून मोकळे केल्याचे पत्र मात्र घेण्यात आले नाहीत किंवा दिलेल्या माहितीत पत्र दिसून येत नाही. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी १ मार्च ते ३० जून २०१५ पर्यंत दिलेल्या कामकाजाची दैनंदिनीमध्ये भ्रामक माहिती दर्शविण्यात आली आहे. या दैनंदिनीवरुन सर्व कामे खोटे दर्शविण्यात आले असून शेतकरी, विभाग आणि शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)