शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 21, 2016 01:54 IST

कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही.

शासन व शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेक : कृषी विभागाला भ्रष्टाचाराचे गालबोटकाचेवानी : कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही. आजघडीला सर्वाधिक मालदार कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी दिसून येतात.कृषी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकरी व शासनाच्या डोळ्यात धूळ टाकून स्वार्थहित कसा साधला, हे सध्या गोरेगाव कृषी तालुक्यांतर्गत चोपा मंडळ कृषी कार्यालयात बोटे येथे कार्यरत आणि २०१५ मध्ये कामे करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर आलेले एन.एस. ईलमे यांच्या दैनिक कार्यावरुन दिसून येते.माहिती अधिकाराखाली प्राप्त दैनंदिनी कामकाजावरुन कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी तालुका कृषी अधिकारी तिरोडा व गोरेगाव शेततळी आणि शासनाला चुकीचे कामे दाखवून फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. कामाचे दिवस चुकीचे दाखविणे, शेतकऱ्यांसमक्ष कामाच्यापूर्वी व नंतर मोजमाप न करता दाखवणे, गोरेगाव व तिरोड्याचे काम पाहणे, कामे सोडून प्रवास रजा सवलत (एल.टी.सी.) दाखवून शासनाकडून लाभ घेणे, प्रतिनियुक्ती ठिकानातून सतत अनुपस्थित राहणे, चार लाख रुपयांची कामे एकाच दिवशी पूर्ण केल्याचे सांगणे, अशा अनेक बाबी आहेत. त्यावरून कृषी सहायक एन.एस. इलमे यांनी सर्वांशी धोकाधडी करुन फसवणूक केल्याचे दिसून येते.बसबसपुरा येथे १०७-९४ हे.आर.मध्ये १७ लाख २२ हजार ६४३ रुपयांचे काम दाखविण्यात आले आहेत. माहिती अधिकारात अपूर्ण माहिती मिळाली असली तरी अपूर्ण माहितीकरिता राज्य आयोगाला अपिल करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया यांनी (जी.क्र/उविक्रअ कृसप्रतिनियुक्ती/११३/२०१५ दिनांक २७/१/२०१५) विविध योजनांच्या अल्प प्रगतीचा विचार करता कार्यालयीन व क्षेत्रीय कामे पूर्ण करण्याकरिता प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी २ मार्च २०१५ ला क्षेत्रीय कामे करण्याकरिता कार्यमुक्त केले. १२ जून २०१५ ला आदेश (क्र.६३३/२०१५) गोरेगाव तालुका कृषी अधिकारी यांनी कामाची अडचण पाहता तात्काळ रुजू होण्यास कळविले.कृषी सहायक नाना ईलमे यांनी स्वत:च्या मर्जीने १२ जून २०१५ ला गोरेगाव कार्यालयात रुजू झाले. तिरोड्यातून मोकळे केल्याचे पत्र मात्र घेण्यात आले नाहीत किंवा दिलेल्या माहितीत पत्र दिसून येत नाही. कृषी सहायक नाना एस. इलमे यांनी १ मार्च ते ३० जून २०१५ पर्यंत दिलेल्या कामकाजाची दैनंदिनीमध्ये भ्रामक माहिती दर्शविण्यात आली आहे. या दैनंदिनीवरुन सर्व कामे खोटे दर्शविण्यात आले असून शेतकरी, विभाग आणि शासनाची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)