शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

मामा तलाव सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:56 IST

शहरातील मामा तलाव नागरिकांना सिंचन सोयीसाठी उपयुक्त आहे. सदर तलावाचे सौंदर्यीकरण व परिसरात वृक्ष लागवड करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसेच येथे पर्यटन स्थळ बनवून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविणे सोईस्कर आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण : तलाव खोलीकरण व वृक्ष लागवड थंडबस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शहरातील मामा तलाव नागरिकांना सिंचन सोयीसाठी उपयुक्त आहे. सदर तलावाचे सौंदर्यीकरण व परिसरात वृक्ष लागवड करणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसेच येथे पर्यटन स्थळ बनवून त्यातून आर्थिक उत्पन्न मिळविणे सोईस्कर आहे. परंतु याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तलाव परिसरात अतिक्रमण वाढले आहे.आमगाव शहराच्या मध्यभागी असलेला मामा तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या तलावाला विकासाची प्रतीक्षा आहे. शासन योजना हाती असून सुध्दा या तलावाच्या विकासासाठी अद्याप पाऊल उचलले गेले नाही.शहराच्या मध्य भागात असलेला तलावात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना सिंचनाच्या सोयीसाठी मदत होते. परंतु तलावात नागरिकांकडून मूर्ती विसर्जन, पूजा साहित्य विसर्जनामुळे तलावातील खोलीकरणावर परिणाम झाला आहे. तलाव परिसरातील टाकाऊ वस्तूमुळे प्रदूषणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिक वस्ती प्रदूषणामुळे त्रस्त झाली आहे.पर्यटनस्थळ विकास व सौंदर्यीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमाने या तलाव परिसराचे विकासाकरिता वाव आहे. तर नरेगा अंतर्गत तलाव खोलीकरणाच्या योजना आहेत. परंतु योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेत नाही. तलाव परिसरात वृक्ष लागवडीतून पर्यावरणाला वाव आहे.तलाव खोलीकरणातून स्वीमिंग टँक, बोटींग ट्रॅक, वॉटर स्लायडर व गार्डनची संकल्पना पुढे आल्यास या तलावाचा उपयोग नागरिकांना होवू शकेल. तर याच पर्यटन स्थळातून शासनाला कराच्या स्वरुपात नागरिकांकडून निधी गोळा करता येईल.शासनाच्या विविध योजनांतून तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. योजना व निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाकडे नियोजन प्रस्ताव नसल्याने ही तलावे संपण्याचा मार्गावर आहेत.तलाव परिसरात नागरिकांनी अतिक्रमण करुन त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले आहे. त्यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.तसेच तलाव परिसरात टाकाऊ वस्तुंचे खच साचत असल्याने पर्यावरणाची समस्या आवासून उभी आहे. या परिसरात स्वच्छता राखून ठेवण्यासाठी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक ठरले आहे.