शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:48 IST

गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या : कमी पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला. मात्र यंदा शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पण, याकडे जिल्हा प्रशासाने डोळेझाक केली असल्याने शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असेच चित्र पाहयला मिळत आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली. परिणामी जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पामध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. कमी पावसामुळे भूजल पातळी सुध्दा एक ते दीड मीटरने खालावली. जलाशयातील पाण्यावरच भूजल पातळी अवलंबून असते. शिवाय सिंचन आणि पाणी पुरवठा विभाग देखील त्यानुसार टंचाई आराखडा तयार करुन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करीत असते. पण, यंदा जिल्ह्यात सर्वत्र कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सडक-अजुनी, गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील काही गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यास चार ते पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच पाणी टंचाईची ओरड सुरू झाल्याने प्रशासनाची सुध्दा झोप उडाल्याचे चित्र आहे. मागील ३० वर्षांत कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला जलाशयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा असल्याने यावर मार्ग काढायचा कसा अशी बिकट समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर त्वरीत बैठक घेवून तोडगा काढला. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्याचे चित्र आहे.गत सहा वर्षांमध्ये यंदा सर्वात कमी पाऊसजिल्ह्यात मागील पाच सहा वर्षातील पावसाच्या सरासरी नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून येते. २०१०-११ मध्ये १०४९ मि.मी., २०११-१२ मध्ये १३८५.८० मि.मी.२०१२-१३ मध्ये १६७२.१० मि.मी., २०१३-१४ मध्ये ८२८.२० मि.मी.२०१४-१५ मध्ये ९७८.६० मि.मी., २०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.२०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.आणि २०१७ मध्ये केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.जनावरांच्या चाºयाची समस्याकमी पावसामुळे यंदा धानाच्या उत्पादनात देखील घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर पावसाअभावी जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावातील तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी चाºयाची सोय कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.