शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:48 IST

गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या : कमी पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया शहरावर पाणी टंचाईचे सावट निर्माण होताच जिल्हा प्रशासनाने पुजारीटोला प्रकल्पाच्या माध्यमातून तोडगा काढला. मात्र यंदा शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पण, याकडे जिल्हा प्रशासाने डोळेझाक केली असल्याने शहराकडे लक्ष अन ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असेच चित्र पाहयला मिळत आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली. परिणामी जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पामध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. कमी पावसामुळे भूजल पातळी सुध्दा एक ते दीड मीटरने खालावली. जलाशयातील पाण्यावरच भूजल पातळी अवलंबून असते. शिवाय सिंचन आणि पाणी पुरवठा विभाग देखील त्यानुसार टंचाई आराखडा तयार करुन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करीत असते. पण, यंदा जिल्ह्यात सर्वत्र कमी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सडक-अजुनी, गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील काही गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यास चार ते पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच पाणी टंचाईची ओरड सुरू झाल्याने प्रशासनाची सुध्दा झोप उडाल्याचे चित्र आहे. मागील ३० वर्षांत कधी नव्हे ते यंदा गोंदिया शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला जलाशयाचा आधार घेण्याची वेळ आली आहे. मात्र सिंचन प्रकल्पांमध्ये देखील मोजकाच पाणीसाठा असल्याने यावर मार्ग काढायचा कसा अशी बिकट समस्या त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर त्वरीत बैठक घेवून तोडगा काढला. मात्र ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला वेळ नसल्याचे चित्र आहे.गत सहा वर्षांमध्ये यंदा सर्वात कमी पाऊसजिल्ह्यात मागील पाच सहा वर्षातील पावसाच्या सरासरी नजर टाकल्यास यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून येते. २०१०-११ मध्ये १०४९ मि.मी., २०११-१२ मध्ये १३८५.८० मि.मी.२०१२-१३ मध्ये १६७२.१० मि.मी., २०१३-१४ मध्ये ८२८.२० मि.मी.२०१४-१५ मध्ये ९७८.६० मि.मी., २०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.२०१५-१६ मध्ये १०११.७७ मि.मी.आणि २०१७ मध्ये केवळ ७५० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.जनावरांच्या चाºयाची समस्याकमी पावसामुळे यंदा धानाच्या उत्पादनात देखील घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर पावसाअभावी जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावातील तलावांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी चाºयाची सोय कुठून करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.