शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

महाप्रसादाच्या नोंदणीकडे ‘एफडीए’ची डोळेझाक

By admin | Updated: September 1, 2016 00:19 IST

गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून होत असलेल्या महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे...

अन्य विभाग सक्रिय : एफडीएचे मात्र मौनगोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून होत असलेल्या महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आणि त्यांच्या नियमानुसार महाप्रसाद वितरण करण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द हा विभागच उदासीन दिसत आहे. याबाबतची माहिती देणारे किंवा आवाहन करणारे कोणतेही पत्रक या विभाग अद्याप काढलेले नाही.अन्य विभागांकडून मंडळांना परवानगी व नोंदणीचे आवाहन केले जात असताना अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप तरी काहीच कळविण्यात आलेले नाही. साधे पत्रक काढून मंडळांना आवाहन करण्याची तसदी आतापर्यंत घेतली गेलेली नाही. यातून विभागाचे गोंदिया जिल्ह्याकडे किती लक्ष आहे याची प्रचिती येते. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केले जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात मात्र महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हातवर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत आजवर अन्न व औषध प्रशासनाकडून ना जाहीरात ना पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. परिणामी गणपती उत्सव मंडळांकडून आपल्या मर्जीने महाप्रसाद वाटपाचे पुण्य कमाविले जाते. विशेष म्हणजे मंडळांना विविध विभागांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, पोलीस विभागाकडून परवानगी संबंधीची माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून शिवाय पत्रकांच्या माध्यमातून दिली जाते. वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणीसाठी पत्रकांच्या माध्यमातून आवाहन व माहिती दिली जाते. मात्र महाप्रसाद वितरणासारख्या महत्वाच्या विषयाला घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप काहीच पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशात एखाद्या मंडळाच्या महाप्रसादातून काही अनुचित प्रकार घडल्यास मात्र हा विषय गंभीर स्वरूप धारण करू शकतो हे येथे विचारात घेणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)-तर तशी व्यवस्था करवून घेऊमहाप्रसाद वितरणाच्या या महत्वाच्या विषयाला घेऊन अन्न व औषध प्रशासन गंभीर नाही हे या प्रकारातून कळले. मात्र ‘लोकमत’ने याबाबत जाणून घेण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कार्यालयात जावून नोंदणी करण्यास सांगीतले. मात्र मंडळांना याबाबत माहिती होणे गरजेचे आहे, त्याशिवाय नोंदणी कशी होणार? असे विचारल्यावर अधिकाऱ्यांनी पत्रक काढण्याची व्यवस्था करू, असे थंड उत्तर दिले.