शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी झाली तर या २१ भागांना धोका,पावसात या ठिकाणी न गेलेले बर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीमुळे पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील २१ गावांना फटका बसतो तर पाच ते सहा ...

गोंदिया : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा आणि बाघ नदीमुळे पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील २१ गावांना फटका बसतो तर पाच ते सहा ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानंतर धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी न गेलेले बरे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. वैनगंगा आणि बाघ नदीला पूर आल्यास तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील २१ गावांना फटका बसतो. ब्राम्हणटोला, पुजारीटोला, वडेगाव, बिरसोला, कासा, किन्ही, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा, लोधीटोला, मरारटोला, किडंगीपार, अर्जुनी, सावरा, पिपरिया, चांदोरी खुर्द, चांदोरी बु., घाटकुरोडा, करटी या गावात अतिवृष्टी झाल्यानंतर धोकादायक परिस्थिती निर्माण होते.

.................

शहरातील पाणी साचणारी ठिकाणे

जोराचा पाऊस अथवा अतिवृष्टी झाल्यास कटंगी कला, पिंडेकपार, फुलचूर, कुडवा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हा भाग पांगोली नदी लगत असल्याने या नदीचे पाणी बरेचदा या भागात शिरते त्यामुळे या परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण होते. हा भाग थोडा सखल असल्याने या भागात पाणी साचत असल्याची माहिती आहे.

.............

पालिकेचे तेच रडगाणे

दरवर्षी पावसाळ्यात शहरातील काही भागात पाणी साचते. थोडा पाऊस झाला की शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. शहरातील गंजवाॅर्डातील भाजीबाजारात तर ही समस्या आता नेहमीच झाली आहे. मात्र यावर नगर परिषदेने अद्यापही तोडगा काढला नाही. ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी कुठल्याच उपाययोजना केल्या नाही. नगर परिषदेने नेहमीच वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत याकडे डोळेझाक करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे पालिकेचे तेच रडगाणे कायम असल्याचे चित्र आहे.

...........

पाणी साचण्याची कारणे

- वैनगंगा आणि बाघ नदीला पूर आल्यास ओव्हरफ्लो हाेऊन नदी काठालगत असलेल्या गावांमध्ये पाणी साचते.

- ही २१ गावे नदी पात्रापासून काही अंतरावर आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने या भागात पाणी साचते.

- गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील धरणातील पाणी सोडल्यास वैनगंगा आणि बाघ नदीचे पात्र फुगते त्यामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील २१ गावांना याचा फटका बसतो.

- हा भाग काही प्रमाणात सखल असल्याने सुध्दा या भागात लवकर पाणी साचते.

.............

ही आहेत सर्वाधिक धोकादायक स्थळे

जिल्ह्यातील धापेवाडा सिंचन प्रकल्प, इटियाडोह, हाजराफॉल, रजेगाव घाट या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. विशेष पुलावरुन पाणी वाहत असताना प्रवास करणे, डोहाजवळ मस्ती करणे यामुळे या परिसरात दरवर्षी घटना घडतात. त्यामुळे या ठिकाणी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

...............

पाऊस नको नको सा.....

दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगा आणि बाघ नदीला आलेल्या पुरामुळे आमच्या गावाला फटका बसतो. मागील वर्षी सुध्दा पुराचा फटका बसल्याने आठ ते दहा दिवस दुसरीकडे जाऊन राहावे लागले होते. अतिवृष्टी झाल्यास मोठी समस्या निर्माण होते.

- विकास गायकवाड,

........

आमचे गाव बाघ नदी काठालगत असल्याने अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावात पाणी साचते. बरेचदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास गावात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनातर्फे आम्हाला सुरक्षित स्थळी हलविले जाते.

- देवीदास उमक,