शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

वीज कडाडल्यास मोबाइल दूर ठेवा व लोखंडी वस्तूंचा आश्रय टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:21 IST

गोंदिया : पावसाळ्यात वीज कडकडाट करून पडण्याचे प्रकार घडत असून यातच मानवासह जनावरांचाही जीव जातो. वीज कडाडली की नागरिक ...

गोंदिया : पावसाळ्यात वीज कडकडाट करून पडण्याचे प्रकार घडत असून यातच मानवासह जनावरांचाही जीव जातो. वीज कडाडली की नागरिक मिळेल त्या जागी आश्रय घेतात तसेच आपल्या जनावरांना बांधून मोकळे होतात. मात्र, अशातच त्यांचा घात होतो. म्हणूनच विजेचा कडकडाट झाल्यास काय खबरदारी घ्यावी, याबाबत आजही कित्येकाला माहिती नाही. यामुळेच जिल्ह्यात सन २०१८ पासून आतापर्यंत २१ जणांचा जीव गेला आहे. यामुळे विजेचा कडकडाट झाल्यास लोखंडी वस्तूंपासून दूर राहून अशा ठिकाणी आश्रय टाळावा. पक्क्या व मजबूत बांधकामाखालीच आश्रय घ्यावा ही बाब प्रामुख्याने प्रत्येकाने जाणून घेण्याची गरज आहे.

---------------------------

वीज पडल्याने झालेले मृत्यू

२०१८ - ३

२०१९- ३

२०२०- ९

२०२१ (१५ जुलैपर्यंत)- ६

------------------------

कोणाला किती मिळाली नुकसान भरपाई

- सन २०१८ मध्ये वीज पडून जिल्ह्यात ३ जणांना मृत्यू झाला असून त्यांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे.

- सन २०१९ मध्ये ३ जणांना वीज पडून मृत्यू झाला असून यातील दोघांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, एक प्रकरण अपात्र ठरविण्यात आले आहे.

- सन २०२० मध्ये वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला असून या सर्वांनाच शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

---------------------------------

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

- ढगा‌ळ वातावरण व विजेचा कडकडाट होत असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे किंवा सुरक्षित स्थानी राहावे.

- विजेचा कडकडाट होताना धातूच्या वस्तूंपासून (टिनाचे शेड, लोखंडी खांब) दूर राहावे.

- विजेचा कडकडाट होत असताना शक्यताे मोबाइलचा वापर टाळावा. तसेच घराती वीज उपकरण त्वरित बंद करावे.

- शेतकऱ्यांनी शेतात काम न करता त्वरित पक्क्या बांधकामाखाली आश्रय घ्यावा. जनावरांनाही झाड किंवा शेडखाली बांधू नये.

- राजन चौबे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

---------------------------

अंजोरा व काटी येथे वीज अटकाव यंत्रणा

जिल्ह्यात २ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी येथे वीज अटकाव यंत्रणा असून आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथे वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे.