शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पोलीस पाटलांना मारहाण केल्यास होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. गुन्ह्याच्या तपासात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच महात्मा गांधी ...

गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. गुन्ह्याच्या तपासात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे निमंत्रक म्हणून ते कार्य करीत असतात. कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन ग्राम व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. कर्तव्य बजावत असताना कोरोना संक्रमित होऊन राज्यातील २० पोलीस पाटलांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान कार्य करीत असताना अनेक ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले व गंभीर दुखापत झाली. त्यामुळे पोलीस पाटलांना कायद्यानुसार संरक्षण द्यावे ही मागणी अनेक वर्षांपासून पोलीस पाटील संघटना करीत होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

......

कलम ३५३ नुसार होणार गुन्हा दाखल

गृह विभागाने ७ जून २०१८ अन्वये भादंवि ३५३ कलमामध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासकीय लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावीत असताना मारहाण झाल्यास संबंधिताविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. संबंधित कक्षेत पोलीस पाटील येत असून, ३ मार्चला २०२१ च्या अधिसूचनेनुसार पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचे समजून संबंधिताविरुद्ध कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.

.....

पाठपुराव्याला आले यश

या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी स्वागत केले आहे. लवकरच पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून त्यांना सेवानिवृत्तीची योजना लागू करून त्यांना वृद्धापकाळात जगण्यासाठी सरंक्षण प्रदान करावे, अशी मागणी केली आहे. जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, सचिव राजेश बन्सोड, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, श्रीराम झिंगरे, नंदा ठाकरे, अनिता लंजे व गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेने पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले आहे.