शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:57 IST

मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला.

ठळक मुद्देगोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. तर राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दिलेले आश्वासन पूर्ण केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची आर्थिक मदत देण्याचे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोहारा, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, बलमाटोला, निलज, लोधीटोला, अंभोरा, बटाना, हलबीटोला, चांदनीटोला, गोंडीटोला, भागवतटोला येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, देवराव मसे, भागेश बिजेवार, व्यंकट मेश्राम, जगतराय बिसेन, ईश्वर पटले, चिंतामन चौधरी, टेकचंद सिहारे, धम्मानंद मेश्राम, धनलाल ठाकरे व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, जनसंघर्ष यात्रेची दखल घेत भाजप सरकारने राज्यात शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र यामध्ये सरकारने लावलेल्या अटी-शर्तींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफीचा माफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला.एकीकडे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात धानाला २५०० रूपये भाव हमीभाव दिला जात आहे. तर राज्यात १७५० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.भापजच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी बेहाल झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड प्रमाणेच आता केंद्रातूनही भाजपला निरोप देण्याची वेळ आली असल्याचेही आमदार अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल