शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:57 IST

मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला.

ठळक मुद्देगोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. तर राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दिलेले आश्वासन पूर्ण केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची आर्थिक मदत देण्याचे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोहारा, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, बलमाटोला, निलज, लोधीटोला, अंभोरा, बटाना, हलबीटोला, चांदनीटोला, गोंडीटोला, भागवतटोला येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, देवराव मसे, भागेश बिजेवार, व्यंकट मेश्राम, जगतराय बिसेन, ईश्वर पटले, चिंतामन चौधरी, टेकचंद सिहारे, धम्मानंद मेश्राम, धनलाल ठाकरे व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, जनसंघर्ष यात्रेची दखल घेत भाजप सरकारने राज्यात शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र यामध्ये सरकारने लावलेल्या अटी-शर्तींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफीचा माफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला.एकीकडे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात धानाला २५०० रूपये भाव हमीभाव दिला जात आहे. तर राज्यात १७५० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.भापजच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी बेहाल झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड प्रमाणेच आता केंद्रातूनही भाजपला निरोप देण्याची वेळ आली असल्याचेही आमदार अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल