शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:57 IST

मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला.

ठळक मुद्देगोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. तर राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दिलेले आश्वासन पूर्ण केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची आर्थिक मदत देण्याचे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोहारा, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, बलमाटोला, निलज, लोधीटोला, अंभोरा, बटाना, हलबीटोला, चांदनीटोला, गोंडीटोला, भागवतटोला येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, देवराव मसे, भागेश बिजेवार, व्यंकट मेश्राम, जगतराय बिसेन, ईश्वर पटले, चिंतामन चौधरी, टेकचंद सिहारे, धम्मानंद मेश्राम, धनलाल ठाकरे व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, जनसंघर्ष यात्रेची दखल घेत भाजप सरकारने राज्यात शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र यामध्ये सरकारने लावलेल्या अटी-शर्तींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफीचा माफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला.एकीकडे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात धानाला २५०० रूपये भाव हमीभाव दिला जात आहे. तर राज्यात १७५० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.भापजच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी बेहाल झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड प्रमाणेच आता केंद्रातूनही भाजपला निरोप देण्याची वेळ आली असल्याचेही आमदार अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल