शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

स्वत:तील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : स्पर्धा परीक्षेतील गुणवंत व त्यांच्या पालकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : एमपीएससी, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:तील क्षमता, बुद्धी व ऊर्जेचे आत्मपरिक्षण करुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा तेव्हा स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले.दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा आयोजित स्पर्धा परीक्षेतील कर्तृत्ववान यशवंत व त्यांच्या पालकांच्या सत्कार गुरूवारी करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, नगर पंचायत उपाध्यक्ष आफताब शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार मंचावर उपस्थित होते. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत कुठल्याही शार्टकट पद्धतीने यश प्राप्त करता येत नाही तर त्याकरिता खूप संघर्ष करुन जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा लागतो. वेळेचे नियोजन करणे बंधनकारक आहे. त्या माध्यमातून नियोजन करुन स्पर्धा परीक्षेचा प्रवास गाठत ठरलेल्या ध्येयापर्यंत निश्चित रुपात पोहोचता येते.स्वत:चा अनुभव सांगत स्पर्धा परीक्षेविषयी उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरच्या स्वरुपात संवाद साधला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वत:चा यशोप्रभात सांगत असताना त्यांनी अडचणींना सामोरे जाऊन यश कसे प्राप्त झाले याचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवरी तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या निखील संतोष बन्सोड, नितीन राजाराम बरैया या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.माध्यमिक शालांत परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेली अनुश्री हेमंत भेंडारकर या विद्यार्थिनीचा सुध्दा या वेळी सत्कार करण्यात आला. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे आवाहन कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.जी.एम.मेश्राम यांनी तर आभार सी.यू.उईके यांनी मानले. कार्यक्रमासाठी हर्षवर्धन मेश्राम, गोपाल चनाप, अरुण मानकर, सितेश ईश्वर, सचिन वासनिक यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी