शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

‘टायरचं लाईफ' वेळेवर ओळखा; अन्यथा 'तुमचं लाईफ' संपेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 21:02 IST

Gondia News टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

गोंदिया : आजकाल धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वाहनांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, अन्यथा वाहनमालकांचे नुकसान होते. सायकल, दुचाकी, तीनचाकी, कार, प्रवासी व जड वाहतुकीच्या प्रत्येक वाहनाला टायर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर खराब होणे परवलीचे असताना आता वाढत्या तापमानात टायर माना टाकत आहेत.

सध्या चाळिशीजवळ पोहोचलेल्या तापमानामुळे डांबरी रस्ते चटके देत आहेत. उन्हाच्या तडाख्याने टायरची झीज होणे, टायर फुटणे व तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी व जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर जास्त प्रमाणात खराब होत आहेत. कडक उन्हाळ्यात तासन्तास प्रवास करताना अनेक वेळा काही लोकांच्या वाहनांचे टायर फुटतात. टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

टायर्ससाठी एवढं करा...

 

- टायरचं आयुष्य तीन वर्षे किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खरेदी करू नका. उन्हाळ्यात जास्त गाडी चालवल्याने टायर फुटण्याची भीती असते. त्यामुळे टायरमध्ये प्रेशर चेक करा.

 

- ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. कारण, उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने फ्युअल लिकेज होऊ शकते. अनेकदा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता कमीच ठेवा. उन्हात कारचा रंग उडू शकतो. तसेच टायर फेल होऊ शकते.

रिमोल्डचा पर्याय

-प्रवासी व व्यावसायिक वाहतुकीच्या वाहनांना रिमोल्ड टायर वापरत नाहीत. दुचाकी व तीनचाकीचे वाहनधारक रिमोल्ड टायर खरेदी करीत आहेत. मध्यमवर्गीय दुचाकी व रिक्षाचालक मात्र वाहनांसाठीचे जादा टायर रिमोल्ड दर्जाचे वापरतात.

-टायर फुटण्याच्या प्रकाराने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण तर वाढतेच, सोबतच यापूर्वी काढलेल्या पंक्चरचे ठिगळ वितळत आहे. याचा वाहनधारकांना फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

काय म्हणतात विक्रेते

टायरच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ असतेच, वाहतूक खर्च वाढल्याने टायरच्या किमती वधारल्या आहेत. टिकाऊ ब्रॅण्डला वाहनधारक अधिक पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

- जी. एम. ठाकरे, टायर विक्रेता

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा