शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘टायरचं लाईफ' वेळेवर ओळखा; अन्यथा 'तुमचं लाईफ' संपेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 21:02 IST

Gondia News टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

गोंदिया : आजकाल धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वाहनांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, अन्यथा वाहनमालकांचे नुकसान होते. सायकल, दुचाकी, तीनचाकी, कार, प्रवासी व जड वाहतुकीच्या प्रत्येक वाहनाला टायर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर खराब होणे परवलीचे असताना आता वाढत्या तापमानात टायर माना टाकत आहेत.

सध्या चाळिशीजवळ पोहोचलेल्या तापमानामुळे डांबरी रस्ते चटके देत आहेत. उन्हाच्या तडाख्याने टायरची झीज होणे, टायर फुटणे व तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी व जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर जास्त प्रमाणात खराब होत आहेत. कडक उन्हाळ्यात तासन्तास प्रवास करताना अनेक वेळा काही लोकांच्या वाहनांचे टायर फुटतात. टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

टायर्ससाठी एवढं करा...

 

- टायरचं आयुष्य तीन वर्षे किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खरेदी करू नका. उन्हाळ्यात जास्त गाडी चालवल्याने टायर फुटण्याची भीती असते. त्यामुळे टायरमध्ये प्रेशर चेक करा.

 

- ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. कारण, उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने फ्युअल लिकेज होऊ शकते. अनेकदा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता कमीच ठेवा. उन्हात कारचा रंग उडू शकतो. तसेच टायर फेल होऊ शकते.

रिमोल्डचा पर्याय

-प्रवासी व व्यावसायिक वाहतुकीच्या वाहनांना रिमोल्ड टायर वापरत नाहीत. दुचाकी व तीनचाकीचे वाहनधारक रिमोल्ड टायर खरेदी करीत आहेत. मध्यमवर्गीय दुचाकी व रिक्षाचालक मात्र वाहनांसाठीचे जादा टायर रिमोल्ड दर्जाचे वापरतात.

-टायर फुटण्याच्या प्रकाराने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण तर वाढतेच, सोबतच यापूर्वी काढलेल्या पंक्चरचे ठिगळ वितळत आहे. याचा वाहनधारकांना फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

काय म्हणतात विक्रेते

टायरच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ असतेच, वाहतूक खर्च वाढल्याने टायरच्या किमती वधारल्या आहेत. टिकाऊ ब्रॅण्डला वाहनधारक अधिक पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

- जी. एम. ठाकरे, टायर विक्रेता

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा