शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

‘टायरचं लाईफ' वेळेवर ओळखा; अन्यथा 'तुमचं लाईफ' संपेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2023 21:02 IST

Gondia News टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

गोंदिया : आजकाल धावत्या कारचा टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वाहनांची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, अन्यथा वाहनमालकांचे नुकसान होते. सायकल, दुचाकी, तीनचाकी, कार, प्रवासी व जड वाहतुकीच्या प्रत्येक वाहनाला टायर हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर खराब होणे परवलीचे असताना आता वाढत्या तापमानात टायर माना टाकत आहेत.

सध्या चाळिशीजवळ पोहोचलेल्या तापमानामुळे डांबरी रस्ते चटके देत आहेत. उन्हाच्या तडाख्याने टायरची झीज होणे, टायर फुटणे व तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी व जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर जास्त प्रमाणात खराब होत आहेत. कडक उन्हाळ्यात तासन्तास प्रवास करताना अनेक वेळा काही लोकांच्या वाहनांचे टायर फुटतात. टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. अशा घटनांमध्ये मोठा अपघात होऊन लोकांचा जीव गेल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे गाडीच्या टायर्सची काळजी घेणे गरजेचे आहे.

टायर्ससाठी एवढं करा...

 

- टायरचं आयुष्य तीन वर्षे किंवा ४० हजार किमीपर्यंत असते. सहा महिन्यांपेक्षा जुने टायर खरेदी करू नका. उन्हाळ्यात जास्त गाडी चालवल्याने टायर फुटण्याची भीती असते. त्यामुळे टायरमध्ये प्रेशर चेक करा.

 

- ऊन असल्याने पेट्रोल किंवा डिझेलची टँक फुल करू नका. कारण, उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने फ्युअल लिकेज होऊ शकते. अनेकदा आग लागण्याची भीती असते. त्यामुळे नेहमी टँक फुल न करता कमीच ठेवा. उन्हात कारचा रंग उडू शकतो. तसेच टायर फेल होऊ शकते.

रिमोल्डचा पर्याय

-प्रवासी व व्यावसायिक वाहतुकीच्या वाहनांना रिमोल्ड टायर वापरत नाहीत. दुचाकी व तीनचाकीचे वाहनधारक रिमोल्ड टायर खरेदी करीत आहेत. मध्यमवर्गीय दुचाकी व रिक्षाचालक मात्र वाहनांसाठीचे जादा टायर रिमोल्ड दर्जाचे वापरतात.

-टायर फुटण्याच्या प्रकाराने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण तर वाढतेच, सोबतच यापूर्वी काढलेल्या पंक्चरचे ठिगळ वितळत आहे. याचा वाहनधारकांना फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

काय म्हणतात विक्रेते

टायरच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ असतेच, वाहतूक खर्च वाढल्याने टायरच्या किमती वधारल्या आहेत. टिकाऊ ब्रॅण्डला वाहनधारक अधिक पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

- जी. एम. ठाकरे, टायर विक्रेता

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा