शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

सामान्य कार्यकर्त्यांच्या लढाईत मी सोबत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:22 IST

मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : प्रताप लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : मागील ४० वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काम करीत आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या पुढे अनेक वादळे आलीत. परंतु त्यांना वाचवित ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. या प्रवासात अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरीही मी एकनिष्ट कार्यकर्ता म्हणून निरंतर काम पाहत आहे. जिल्हा परिषदेपासून नगर परिषदेपर्यंत काँग्रेसचा झेंडा फडकत आहे. काँग्रेसची निती व आत्मसन्मानासाठी कधीच झुकलो नाही. सामान्य कार्यकर्त्याच्या लढाईत मी सोबत असल्याचे उद्गार आ. गोपालदास अग्रवाल यांनी काढले.जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे येथील प्रताप लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, पन्नालाल शहारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जि.प. अध्यक्ष सिमा मडावी, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, माजी आ. रामरतन राऊत, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अ‍ॅड. के.आर. शेंडे, पी.जी. कटरे, राकेश ठाकूर, राजेश नंदागवळी, माधुरी हरिणखेडे, पं.स. सभापती राऊत सालेकसा, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे अर्जुनी मोरगाव, सीमा अटरे, विमल नागपुरे, विजय लोणारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, उषा शहारे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अशोक लंजे, नामदेव किरसान, अशोक चौधरी, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरीपुंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, वासुदेव चुटे, धनलाल ठाकरे, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, महेंद्र पुरोहित, सुनील तिवारी, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, शिलू चव्हाण, क्रांतीकुमार जायस्वाल, दिपीका रुसे, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंगक पाथरु, विशाल शेंडे, अमर वऱ्हाडे, निलम हलमारे, धिरज नशिने, विक्की गोहरे, आनंद तुरकर, धम्मानंद मेश्राम, रत्नदिप दहिवले, जहीर अहमद, जितेंद्र कटरे, कुरमराज चव्हाण, नितीन पुगलिया, रुखसाना सैय्यद, कैलास अग्रवाल, योजना कोतवाल, अ‍ॅड. पी.सी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी कृउबास सभापती चुन्नी बेंद्रे, सडक अर्जुनीच्या माजी सरपंच उषा खोटेले, देवरीचे सेवानिवृत्त आयुक्त अनिल कुंभरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी नाना पटोले यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. झामसिंग बघेले, राधेलाल पटले, सहेसराम कोरोटे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, माजी आ. रामरतन राऊत, माजी मंत्री भरत बहेकार यांनी आपले विचार व्यक्त केले. सोबत आ. गोपालदास अग्रवाल व माजी खा. नाना पटोले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन कार्यकर्त्यांना एकत्र येवून समस्यांना पेलण्याचे आवाहन केले. संचालन अपूर्व अग्रवाल तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.असक्षम चौकीदारामुळे लुटारुंचे पलायन-पटोलेदेशाचा चौकीदार म्हणून स्वत:ला म्हणून घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या डोळ्यासमोरुन निरव मोदी व रोटेमॅक पेन कंपनीचे मालीक कोठारी पलायन झाले. परंतु ज्या गरीबांचे पैसे बँकेत आहेत त्यांच्यावर डाका टाकण्याचा काम चौकीदार करीत आहे. देशाला लुटणारे डोळ्यासमोरुन पळून जातात. मात्र देशाचे मुख्य लोक झाडू लावण्यात व्यस्त असल्याचे टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. भारताचा एक सैनिक शहीद झाला तर पाकचे दहा जणांचे मुंडके कापून आणू, असे सांगणारे मोदी पाकीस्तानच्या प्रधानमंत्र्यांसोबत बिरियानी खायला जातात आणि याचा फायदा चिन घेतो. फक्त गोड बोलून जनतेला जास्त दिवस भ्रमित करता येत नाही. वेळ आल्यावर जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे माजी खा. नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल