शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संकरित वाण देत आहे भरघोष उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील काही वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत वाणाचे धान बियाणे वापरुन शेतीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न चालविला. परंतु आता शेतकऱ्यांनी संकरीत वाणाचे (हायब्रीड) धान बियाणे वापरुन धानाचे दुप्पट उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. यात बºयाचपैकी शेतकºयांना यश येत आहे.

ठळक मुद्देरोग प्रतिकारक क्षमताही अधिक : सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादन

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यातील शेतकरी कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील काही वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत वाणाचे धान बियाणे वापरुन शेतीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न चालविला. परंतु आता शेतकऱ्यांनी संकरीत वाणाचे (हायब्रीड) धान बियाणे वापरुन धानाचे दुप्पट उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. यात बºयाचपैकी शेतकºयांना यश येत आहे. सामान्य स्वरुपाच्या परिस्थितीत संकरीत वाणातून धानाचे भरघोष उत्पादन घेऊन आपले उत्पन्न वाढवित आहेत. इतर शेतकºयांना सुद्धा प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत.धान उत्पादक शेतकरी पारंपारिक शेतीवरच अवलंबून आहे. वेळोवेळी शासनाकडून किंवा जनजागृती करणाºया संस्था किंवा विशेषज्ञाकडून धान उत्पादन शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे पुरजोर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाने बदल स्विकार केलेला दिसत नाही. याचे विविध कारणे आहेत. यात एकतर आपली शेती जास्तीत जास्त प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलंबून असल्याने आधुनिक पद्धतीनुसार शेतीत पाण्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करता येत नाही. कधी फार कमी पाऊस,अतिवृष्टीचा फटका यात शेतीचे सगळे गणित चुकून जातात. दुसरे म्हणजे शेतकरी वर्ग आपल्या वडिलोपार्जित शेतीला पांरपरिक पद्धतीने पीक घेण्यासाठी उपयोग करीत असतो. नवीन बदल स्विकारण्याच्या तयारीत नसतो. शासनाच्या योजना नवीन प्रयोग इत्यादी छोट्या छोट्या शेतकºयांपर्यंत पोहचतच नाही. परिणामी कमी उत्पादन आणि तोट्याची शेती करण्यास शेतकºयांना भाग पडावे लागते. यामुळे अनेक युवा वर्गाने शेतीकडे पाठ सुद्धा फिरविली. परंतु आता मोठ्या प्रमाणावर काही युवा आणि शिक्षित वर्गाचा शेतीकडे कल वाढत चालला आहे. परंतु तो आता पारंपारिक शेतीचा त्याग करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे जास्त लक्ष देऊ लागला.अनेक शेतकºयांनी सिंचनाची सोय करण्यासाठी विहीर, बोअरवेल खोदण्यावर लक्ष केंद्रीत करुन सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर मर्जीप्रमाणे पीक घेता येईल, असा आशावाद निर्माण करीत सिंचनाच्या सोयीसाठी धडपड करीत आहेत.ज्या शेतकºयांनी आपल्या शेतीत सिंचनाची सोय केली आहे. ते शेतकरी आता सुधारीत वाणासोबतच संकरित वाणाचे बियाणे वापरु लागले आहेत. त्यांच्या शेतीत सरासरीपेक्षा दीडपट ते दुप्पट धान उत्पादन घेतले जात आहे. अनेक शेतकरी शेजारच्या छत्तीसगड राज्यातून नवनवीन संकरित धान बियाणे खरेदी करुन सुद्धा आणत असतात. संकरित धान बियाणांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता अधिक असून रोवणीसाठी थोडा उशीरा झाला तरी उत्पादन मिळते. रासायनिक खते, किटनाशकांचा खर्च फार कमी लागत असते. काही संकरित वाण असेही मिळू लागले की पाऊस कमी झाला किंवा गरजेपेक्षा जास्त झाला तरी उत्पादनावर फारसा फटका बसत नाही. त्यामुळे आता अनेक शेतकरी संकरित वाण (हायब्रीड) कडे शेतकºयांचा कल वाढत आहे.शेतकºयांला स्वत:च्या उदरनिर्वाहसह धानाची विक्री करुन आपल्या इतर गरजा भागविण्यासाठी सुद्धा उत्पादनात वाढ हवी असते. त्यामुळे अनेक शेतकरी वर्षभर खाण्यापूरते काही प्रमाणात बारीक प्रजातीचे धान लावतात. उर्वरित ठिकाणी संकरित वाणाचे धान लागवड करीत भरपूर उत्पादन घेऊ लागले आहेत.येणाºया काळात सर्वच शेतकºयांनी धान उत्पादनात असे बदल स्विकारल्यास निश्चितच भरघोष पीक आणि भरपूर उत्पन्न प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या मानसिकतेत बदल आणि शासनाने इमानदारीने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती