शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शेकडो आदिवासी विद्यार्थी भगवान भरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:53 IST

शासकीय व खासगी आश्रमाशांळांमधील अनागोंदी कारभारामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या.

ठळक मुद्देआश्रमशाळा वाºयावर : कर्मचारी रात्री मुख्यालयाच्या बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : शासकीय व खासगी आश्रमाशांळांमधील अनागोंदी कारभारामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या. मात्र यानंतर काही आश्रमशाळा व वसतिगृह व्यवस्थापनाने बोध घेतला नसल्याचे चित्र आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांन रात्री भगवान भरोसे सोडून जवाबदार कर्मचारी मुख्यालयातून गायब राहत असल्याची धक्कादायक बाब सालेकसा तालुक्यात पुढे आली आहे.सालेकसा तालुक्यातील विविध आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहात सध्यास्थितीत दीड हजार आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. प्रतिनिधीने जमाकुडो येथील आश्रमशाळेला भेट दिली असता रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याची बाब निदर्शनास आली.आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी, निवासी राहून त्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी शासनाने आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृह सुरू केले. मात्र त्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सालेकसा तालुक्यात दोन शासकीय आश्रमशाळा आहेत. शासकीय आश्रमशाळामध्ये शंभर टक्के शासनाच्या अनुदातून आणि खासगी शाळांमध्ये शासनाच्या ७५ टक्के आणि व्यवस्थापनाच्या २५ टक्के अनुदानातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्व सोयी सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्येक्षात त्याचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.जमाकुडो येथील आश्रमशाळेत १३८ मुले आणि १६७ मुली असे एकूण ३०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे भेट दिली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक हे मुख्यालयी तर राहत नाही. अधीक्षक आणि त्यांचे सहकारी सुद्धा रात्रीला मुख्यालयी न राहता विद्यार्थ्यांना भगवान भरोसे सोडून अपडाऊन करतात. जिल्ह्यात किंवा विभागात एखाद्या शाळेत एखादी घटना घडली की कर्तव्य तत्पर असल्याचे दाखविण्यासाठी एक दोन दिवस मुख्यालयी राहत असल्याची बाब पुढे आली.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन इमारत बांधली. मात्र त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने पटसंख्या घसरत आहे. त्यामुळे अनेक खोल्या रिकाम्या आहेत. कर्मचारी वसाहतीच्या इमारती ओस पडल्या आहेत. चारही बाजूला उंच-उंच गवत, जुने साहित्य पडले आहेत.शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे आहेत. त्यामुळे चार्मोशी येथील घटनेची येथे पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक न्याय मंत्र्याच्या जिल्ह्यातच आश्रमशाळा व वसतिगृहांची ही स्थिती आहे.शौचालय, स्वच्छतागृहांची दुरवस्थाशौचालय आणि मुत्रीघराची पाहणी केली असता सर्वत्र घाणच घाण आढळली. गेल्या कित्त्येक दिवसांपासून त्यांची साफसफाई केलेली नाही. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई केली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.अधीक्षक तीन वर्षांपासून गैरहजरनियमित अधीक्षक तीन वर्षापासून गैरहजर असल्याची बाब पुढे आली. सध्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधीक्षकाने माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.मेनूप्रमाणे जेवण नाहीविद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणाच्या मेनू संदर्भात अधीक्षकांना विचारले असता त्यांनी माहिती देणे टाळले. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी मेनू प्रमाणे कधी जेवण मिळत नसल्याचे सांगितले.