शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

शेकडो एकरातील धान रोवणी खोळंबली

By admin | Updated: August 24, 2016 00:07 IST

परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र

बोंडगावदेवी : परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र अस्मानी संकटात सापडलेल्या स्थितीत दिसत आहे. पावसाचा एक थेंब न आल्याने परिसरातील शेकडो एकरातील धानाची रोवणीच झाली नाही, अशी विदारक स्थिती आज सर्वत्र दिसत आहे.परिसरातील निमगाव, अरततोंडी, सिलेझरी, घुसोबाटोला, विहिरगाव, बोंडगावदेवी, चान्ना, देऊळगाव, सिल्ली (रिठी) बोदरा, बाक्टी, खांबी, पिंपळगाव, सरांडी (रिठी) चापटी, इंझोरी, सोमलपूर आदी गावांमध्ये जलसिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. सदर गावशिवारात मोठ्या जलाशयाच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. काही गावांत आजही मालगूजारी, मोठे तलाव, माजी मालगूजार तलाव आहेत. परंतु यावर्षीच्या हंगामात पावसाने एकदाही दमदार हजेरी लावली नसल्याने तलावात पाण्याचा साठा झालेला दिसत नाही. निसर्गाने अवकृपा दाखविल्याने आजघडीला सिल्ली (रिठी) तसेच इतर ठिकाणातील शेकडो एकराच्यावर जमिनी पडीक अवस्थेत आहेत. पाण्याच्या अभावाने धानाची रोवणी आजपावेतो झालेली नाही. तुरकळ पावसाने झालेले रोवणे पाण्याअभावी मरणास्तव झालेले दिसत आहेत. दमट वातावरणाने अळीचा प्रकोप वाढलेला दिसत आहे. परिसरातील बळीराजा येणाऱ्या दिवसात पाण्याची प्रतिक्षा करताना दिसतो. परंतु सकाळच्या प्रहरी निराश होतो. आज शेतकरी वर्ग फार आर्थिक संकटात सापडला असताना परिसरातील लोकप्रतिनिधी शांत बसलेले दिसतात. दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे परिसरात ठिकठिकाणी धानाची रोवणी खोळंबलेली दिसत आहे. शेतात मर-मर राबणारा बळीराजा आज निराश होऊन चिंतामग्न दिसत आहे. (वार्ताहर)विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाटजवळील ग्राम घुसोबाटोला येथील गावातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्याच असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या ग्रामवासीयांसमोर उभी झाली आहे. घुसोबाटोला हे गाव सिलेझरी गट ग्रामपंचायतमध्ये येते. पहाडी भागावर वसलेल्या गावात बऱ्याच घरांमध्ये खाजगी विहिरी आहेत. ५० ते ६० फुट खोलीच्या विहिरी असताना सुद्धा आजघडीला विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. घरच्या विहिरींना भर पावसाळ्यात पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली दिसत आहे. ग्रामपंचायतच्यावतीने गावात बोअरवेलची व्यवस्था आहे. मोजक्या साधनाअभावी घुसोबाटोलावासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीची पायपीट करावी लागत आहे. परिसरात दमदार पावसाने एकदारी हजेरी लावली नसल्याने गावाशेजारील तळ्या-बोळ्यांमध्ये पाणी दिसत नाही. घरगुती विहिरीमध्ये एैन पावसाच्या दिवसात पाण्याचा बुंद संग्रहीत न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याची परिस्थिती गावात दिसून येत आहे.