शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

शेकडो किलो अन्न उकिरड्यावर

By admin | Updated: January 5, 2015 23:06 IST

लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे.

गोंदिया : लग्नसोहळा पार पडल्यानंतर सर्वांनाच भोजनाचा हमखास आग्रह केला जातो. आता तर शहरांप्रमाणेच लहान गावांमध्येही मंगल कार्यक्रमांप्रसंगी पंगतीऐवजी बुफे पद्धती रुढ झाली आहे. या पद्धतीत अनेक जण भूक असो वा नसो, ताटात भरपूर अन्न घेतात व नंतर खायला जड झाले की ते ताटात तसेच सोडून देतात. शेकडो किलो अन्नाची नासाडी होत आहे.वर्षभरात साधारणत: लग्नाचे ३० ते ३५ मुहूर्त असतात. एका मुहूर्ताला ४० हजार किलो म्हणजेच सात हजार लोकांचे अन्न अशा पद्धतीने चक्क उकीरड्यावर टाकले जाते. विशेष म्हणजे, जिल्ह्यात दररोज शेकडो लोक रोज अर्धपोटी झोपत असतानाही अशी नासाडी सुरू आहे. शहरात महागडे लग्न सोहळेही अर्थातच या नासाडीला हातभार लावत आहेत. अन्नाची नासाडी रोखण्याच्या सुधांशू महाराज सत्संग समितीच्या प्रयत्नांना माहेश्वरी, अग्रवाल, जैन अशा विविध समाजांनी पाठिंबा दिला आहे. आपल्या समाजातील लग्न समारंभात भोजनाबाबत त्यांनी आचारसंहिताच लागू केली आहे. भोजनातील पदार्थांची संख्या कमी करण्याचा निर्णय या समाजांनी घेतला आहे. लग्न समारंभात होणाऱ्या अन्नाच्या नासाडीबद्दल जाणून घेण्यात आले. यात शहरातील आठ-दहा मंगल कार्यालयांना भेट देऊन मंगल कार्यालयाचे मालक तसेच केटर्सशी संवाद साधला. एका लग्न समारंभात सरासरी ५०० लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील अर्ध्यापेक्षा जास्त अन्न वाया जाते. उरलेल्या अन्नाने भरलेली ताटं टाकून दिली जातात. एका लग्न समारंभात किमान १००- १५० लोकांचे अन्न वाया जाते. उकिरड्यावर फेकून या अन्नाची विल्हेवाट लावली जाते. वेळेचा अभाव आणि अन्न गरिबांपर्यंत पोहोचिवण्यास साधनांची कमतरता यामुळे नाईलाजाने आम्हाला ते फेकून द्यावे लागते, असे दिसते. उकिरड्यावर फेकलेले अन्न सडून त्यातून मिथेन या घातक वायूची निर्मिती होते. ग्लोबल वॉर्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडीही एकप्रकारे कारणीभूत आहे.अन्न हे पूर्णब्रह्म आहे, आपल्या देशातील ३५ कोटी लोकांना एक वेळचे जेवण मिळत नाही. तर अन्नाची सर्वाधिक नासाडीही आपल्याच देशात होते. ताटात टाकून दिलेले उष्टे अन्न गटारात व उकिरड्यावर टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. उष्टे न टाकता जेवण करणे हा अन्नपूर्णा देवीचा सन्मान होय असे बोलले जाते मात्र वास्तवीक त्यावर अमल कमीच जण करताना दिसतात. यामुळेच मोठ्या प्रमाणात अन्न देवतेचा अपमान केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येते. (शहर प्रतिनिधी)