शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कर्कश आवाजावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:28 IST

मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.

ठळक मुद्देशांततेसाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज : अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.शासनाने डिजेच्या आवाजासाठी मुभा द्यावी, अशी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची नेहमीच मागणी असते. मात्र सर्व मंडळांनी सायलेन्स झोन मध्ये कर्कश आवाज करू नये, मंदीर, मस्जीद, रूग्णालय या परिसरात कर्कश आवाज करू नये, मिरणूक काढतांना वाहतुकीचे नियम पाळावे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे. गणेशोत्सव साजरा करतांना कर्णकर्कश वाद्य वाजवू नये, ५० डेसीबलपेक्षा अधिक आवाज असू नये यासाठी पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व गणेश मंडळे एकत्र येऊन शांततेने काम करणार आहेत.विसर्जन करताना पाण्यात मौज-मस्ती करू नयेडिजेवर अश्लील गाणे वाजविणे टाळावे, भक्तीभाव असावा, गुलाल उधळणे बंद करावे, गणेश विसर्जन मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन नसावे. मिरवणूक काढताना उत्सव मंडळाच्या लोकांनी रस्त्यावरून ये-या करणाऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी जागा सोडावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच विसर्जन करताना पाण्यात मस्ती करणे टाळावे असे ही कळविण्यात आले आहे.१४ संवेदनशील ठिकाणांमध्ये सडक-अर्जुनीगणेशोत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी घडल्या आहेत. राज्यात जातीय दंगल होणाºया १४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असते. एकेकाळी गणेशोत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिमांची भांडणे येथे व्हायची. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने या गावातील लोकांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणल्याने हे गाव आता शांततेच्या मार्गावर आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८