शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

बफर झोनमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष

By admin | Updated: January 17, 2017 00:59 IST

कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये मानव व वन्यप्राणी यांचा मागील काही दिवसात संघर्ष वाढला आहे.

युवराज गोमासे करडी (पालोरा) कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये मानव व वन्यप्राणी यांचा मागील काही दिवसात संघर्ष वाढला आहे. अशा घटनावर वन विभागाच्या वतीने काही उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. या संघर्षामुळे कधी मानवाचा तर कधी वन्यजीवांचा हकनाक बळी जात आहे.कोका वन्यजीव अभयारण्य सन २०१३ मध्ये अस्तित्वात आला. निसर्गाचा वरदहस्त व संरक्षण लाभल्याने अल्पावधीत वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढली. लागूनच अलसेले प्रादेशिक वन विभागाचे जंगल विरळ आहे. अभयारण्यातून लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत मिळेल, असा विश्वास शासनाचे वतीने दाखविण्यात आला. त्यामुळे नागरिकांनीही याला फारसा विरोध न दर्शविता सहयोग दिले. परंतु आज त्या विश्वासाला तडे जाताना दिसत आहेत. लोकांना पर्याप्त रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात वन विभागाला अपयश आले आहेत. उलट नागरिकांच्या जंगलावर आधारित गरजांवर निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे जंगलावर आधारित रोजगार बुडाला. जंगलात गुरे चराई व लाकूड कटाईवर मानवाला प्रतिबंध घातला आहे. दरम्यान अनेकांनी जंगलालगत अतिक्रमण करून वहिवाट सुरू केलेली असल्याने अनेक भागातील वन्यप्राणी बफर झोन, मानवी वस्त्यात शिरकाव करीत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मानव व वन्यप्राणी यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे. यामुळे नागरिक दहशतीत आहेत. वन्यप्राण्याची भीती घालविण्यासाठी शासन, प्रशासनाने जनजागृती मोहिम राबविली. परंतु त्या मोहिमोंचा पाहिजे तसा परिणाम जाणवत नाही. बफर झोनमध्ये मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढला आहे. बफर झोन निर्मितीस अनेक गावांनी विरोध दर्शविला असून त्याची सुरुवात जांभोरा, केसलवाडा, लेंडेझरी, किसनपूर गावांपासून झाली आहे. त्याचे लोण इतर भागात पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.बफर झोन हा मानव व वन्यजीव यांच्या सहजीवनाचा क्षेत्र मानल्या जातो. परंतु याच क्षेत्रात ढिवरवाडा, चिखलाबोडी येथे बिबट्यांनी नरबळी घेतल्याच्या घटनांनी नागरिकांतील असंतोष उफाळून बाहेर पडला. त्याचवेळी बोंडे (खिडकी), ढिवरवाडा व अन्य ठिकाणी वन्यजीवांचा विद्युत करंट लावून जीव घेतला गेला. छुप्या मार्गानीही घातापातांच्या घटना त्यामुळे नाकारता येत नाही.बफर झोनमध्ये शेती पिकविणे वन्यप्राण्यांमुळे आव्हान ठरत आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान नेहमीचीच बाब झाली आहे. शेतातून त्यामुळे झालेला खर्च निघणे कठीण झाल्याने अभयारण्याशेजारील भागात शेकडो एकर शेती पडीत आहे. शासनाचे वतीने नुकसान भरपाईच्या नावावर तोंड पुसण्याचे काम केले जाते. अनेकदा मागण्या करूनही नुकसान भरपाईत वाढ झालेली नाही. नुकसानेचे पंचनामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चहापाण्यासाठी अडवणुकीचे व त्रास देण्याचे धोरण राबविले जाते, ते वेगळेच. शेतातच नाही तर रात्री घरातील गोठ्यात बांधलेले पाळीव प्राणीसुद्धा वन्यजीवांच्या निशान्यावर आहेत. त्यामुळे ग्रामस्थ रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यातूनच वन्यप्राण्यांना मारण्यासाठी विद्युत करंट लावण्यासारखे प्रकार वाढले आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात किटकनाश टाकून मारण्याचा प्रकारही हाताळताना दिसतात. प्रशासनाच्यावतीने अनेकदा गावाला व शेतीला तारेचे कुंपण व इतर उपाययोजना करण्याचा विश्वास देण्यात आला. परंतु आश्वासनांच्या योजना अजूनही कागदावरच प्रत्यक्षात उतरल्या नाही. वन्यप्राण्यांपासून शेती व ग्रामस्थांना वाचविण्याची हमी देण्यात आलेली नाही. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वस्त्यांना बफर झोनमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी अभयारण्यात चांगले खाद्य, फळझाडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संघर्ष वाढीस लागला आहे. यावर वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी स्वादिष्ट व विविधांगी खाद्य नाहीत. बफर झोनमध्ये त्यांना येण्यापासून रोखणाऱ्या यंत्रणा नाहीत. शासनाचे वतीने नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावात व शेतशिवारात वन्यजीवांचा हैदोस वाढला आहे. यावर उपाययोजनांची आवश्यकता आहे.- डॉ.सुनिल बोरकुटे, पर्यावरण व वन्यजीवप्रेमी, कारधा.मानवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करून वावर वाढविला आहे. त्यामुळे वन्यप्राणी क्षेत्राबाहेर येत असल्याने संघर्ष होत असल्याचे दिसून येते. यावर वनविभागाच्या वतीने उपाययोजना सुरु आहेत.- डी.एस. मारबदे, क्षेत्र सहाय्यक, कोका अभयारण्य.