शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

जिल्ह्यात लसींचा साठा मात्र वाट नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली असून, त्याची पूर्तता करणे अशक्य आहे. मात्र ही स्थिती पुन्हा उद्भवू ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली असून, त्याची पूर्तता करणे अशक्य आहे. मात्र ही स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी शासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणासाठी पुरेपुरे प्रयत्न केले जात आहे. मात्र आज जिल्ह्यात लसींचा साठा असून, त्याप्रमाणात नागरिक कमी दिसत आहे. अशात आता कोरोनाला मात देण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन स्वत: लस घेण्याची गरज आहे.

देशात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचे लसीकरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, या लसींना परदेशात मागणी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला या लाटेत मृत्यूचे प्रमाण मागील लाटेच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. अशात तिसरी लाटेबाबत अंदाज लावले जात असून, ही लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, अवघ्या देशातच लसीकरणाची एक चळवळच शासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यातही लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केला जात असून, पात्र असलेल्या समस्त जिल्हावासीयांना लस देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यात सोमवारपर्यंतची (दि.७) आकडेवारी बघितल्यास २,८१,७६३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्या बघता हे प्रमाण कमी असल्याचे दिसते. त्याचे कारण असे की, आजही कित्येक नागरिकांत कोरोना लसीला घेऊन भीती व भ्रम आहेत. परिणामी ते लस घेण्यास पात्र असूनही लस घेत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना लसींचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता जिल्ह्यात लस उपलब्ध असूनही नागरिक लसीकरणासाठी पुढे येताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लसीकरणासाठी आता जनजागृतीची गरज पडत आहे.

------------------------------------

जिल्ह्यात ३५००० उपलब्ध

जिल्ह्यात आजघडीला ३५००० डोस उपलब्ध असल्याची माहिती आहे. यामध्ये १५ डोस कोविशिल्डचे असून सोमवारी (दि.७) कोव्हॅक्सीनचे २० हजार डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आता नागरिकांना ऑनलाइन नोंदणीचीही गरज नसून केंद्रात गेल्यावर लगेच नोंदणी व लस दिली जात आहे. अशात आता नागरिकांनी आपल्या स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लस घेण्याची गरज आहे.

-----------------------------------

गावागावांत सुरू आहे जनजागृती

कोरोना लसीला घेऊन नागरिकांत एक भीती व भ्रम दिसून येत आहे. परिणामी वयोगटात बसूनही नागरिक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. नागरिकांमधील हा भ्रम व भीती निघून जावी यासाठी आता गावागावात जनजागृती केली जात आहे. मात्र लसीची सुरक्षितता व त्याचे परिणाम दुसऱ्या लाटेत अधिक चांगल्याने दिसून आले असून, शास्त्रज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे.