शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

अजून किती दिवस ‘ना घर का, ना घाट का’

By admin | Updated: April 11, 2016 02:01 IST

ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा नगर परिषद या त्रिकुटात सापडलेल्या आमगाव नगरीची स्थिती सध्या ‘...

ओ.बी. डोंगरवार ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा नगर परिषद या त्रिकुटात सापडलेल्या आमगाव नगरीची स्थिती सध्या ‘...ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. नगर पंचायत होण्याकरिता ग्रामपंचायत बर्खास्त करण्यात आली. मग नगर पंचायत नको नगर परिषद व्हावी याकरिता न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आमगावचे काय होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अनेक राजकीय विश्लेषक विश्लेषण करीत असले तरी पुढे काय होणार हे सांगणे कठीण आहे. चेंडू राज्य सरकारच्या दालनात आहे. नगर परिषद झाली पाहिजे याकरिता काही राजकीय मंडळी आपली बाजू ठेवत आहेत. तर कोणी नगर पंचायत किंवा ग्रामपंचायत बरी या विचारसरणीचे आहेत. विचार, तर्कवितर्क अनेकांचे अनेक असले तरी आज या गावाचा वाली कोण? यावर विचार होणे गरजेचे आहे. आमगाव ते खामगाव जे आपण गर्वाने म्हणत होतो ते आमगाव पोरके झाले आहे. पहिल्या कार्यालयात ग्रामपंचायत भवन, असा मोठा फलक होता. नगर पंचायत झाल्यानंतर तो फलक मिटवून नगर पंचायत असा उल्लेख करण्यात येऊन फलक सुद्धा लावण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर पंचायत फलक मिटवून पुन्हा ग्रामपंचायत आमगाव लिहिण्यात आले. जसा सरडा आपला रंग बदलवितो तसा हा फलक आपला रंग बदलवित आहे. नगर परिषद झाली पाहिजे याकरिता अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे विकास गरजेचा आहे. नगर परिषद झाल्यास मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळणार, अनेक कामांना गती येणार हे निश्चित आहे. नगर परिषद झाली तर कर्मचारी जे आज कार्यरत आहेत त्यांना सुगीचे दिवस येतील हे निश्चित, तशी ते वाट पाहत आहेत. सध्या या कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर तेजपणा नाही. आमगावचे काय होणार. हीच उत्कंठा कर्मचाऱ्यांना लागली आहे. तेवढीच विविध राजकारण्यांना सुद्धा लागली आहे. काही राजकीय पक्षाचे डावपेच सुरू झाल्याची चर्चा आहे. एकंदरित नगर परिषद झाली तर पहिला नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा, आपल्या घरचा माणूस होणार, आपल्या मुलास नगराध्यक्षपद मिळणार याकरिता चारही बाजूनी सारीपाटाचा खेळ सुरू आहे. ज्याचा वजीर चालला तो बादशहा होईल. सध्या तालुक्यात तीन पक्ष प्रबळ दावेदार आहेत. मात्र त्यांच्या सोबतीला मनसे, शिवसेना, बसपा हे सुद्धा या निवडणुकीत दंड थोपटून मैदानात उतरतील. वेळ पडली तर एकमेकांचा आधार घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मतदारांचा कौल ज्यांच्याकडे तो सिकंदर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या मजबूत स्थितीत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. सत्ताबदलाचा फायदा राष्ट्रवादीला मिळणार काय हे निवडणुकीनंतरच सर्वांना दिसेल. भारतीय जनता पक्षही सर्व ताकत पणाला लावून आपला पहिला नगराध्यक्ष झाला पाहिजे याकरिता प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षात काही मुरब्बी लोक आहेत. मात्र काहीची ‘पटक दल’ अशी ख्याती आहे. मंचावर बसतील पण आतून काडी चालवून गप्प बसतील व ‘तो मी नव्हेच’ असे नामानिराळे राहून आपली पक्षाबद्दल निष्ठा दाखवतील. या संभावित नगर परिषदेमध्ये बनगाव, आमगाव, रिसामा, कुंभारटोली, किंडगीपार, पदमपूर अशा गावांचा समावेश केला जाण्याची चर्चा आहे. एकूण १७ नगर सेवकांची ही नगर परिषद होईल. जो तो मला तिकीट पाहिजे याकरिता आपल्या पक्षात लॉबींग सुरू करेल. काही चाटूगिरीत मागे राहणार नाही, काही मालसुतो अभियानात अग्रेसर राहतील. कारण संधी नामी चालून येणार आहे. त्याकरिता वाहत्या गंगेत जेवढे हाथ धुवायचे तेवढे धुवून घेऊ, हा धडक उपक्रम काही जण चालवतील. पण नगर परिषद झाली नाही तर नगर पंचायतकरिता लोक लाजेसाठी मैदानात उतरुन आपली ताकत पणाला लावतील. नगर परिषद किंवा नगर पंचायत न होता जर ग्रामपंचायत झाली तर भुकेल्यास मोह गोड याप्रमाणे पूर्ववत आपले नेहमीचेच राहाटगाडगे सुरू ठेवतील. तात्पर्य आज आमगावला वास्तविकत: नगर परिषदेची आवश्यकता आहे. याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी शासन दरबारात प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाही तर आजची आमगाव नगरीची ‘ना घर का, ना घाट का’ ही स्थिती गंभीर आणि विकासकामांन खिळ बसविणारी आहे.