शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

By admin | Updated: June 18, 2015 00:49 IST

पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय ...

५७ पदे रिक्त : कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन प्रलंबितगोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय अपयशी ठरत आहे. अनेक रूग्णांचा बळी जातो. त्यातच जिल्हा आरोग्य विभागात मंजूर नियमित ९८ पैकी ५७ पद रिक्त आहेत. तसेच मंजूर १६ कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन निधी नसल्यामुळे प्रलंबित आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित होते आहे.देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात अनेक संक्रामक आजार पसरतात. मात्र कोट्यवधी रूपये खर्चून जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रचार करणाऱ्या आरोग्य विभागाला रिक्त पदांमुळे मृतकांची संख्या सांगण्यात काहीच गैर वाटत नाही. ग्रामीण व शहरी क्षेत्रात आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. सर्व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागील हेतू होता. आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्वांनाच कोट्यवधी रूपये खर्च करण्याची सूट दिली आहे. परंतु हा निधी केवळ खरेदी व बांधकाम कार्यावरच खर्च होते. खरे पाहता सामान्य नागरिकांना आतासुद्धा खासगी डॉक्टरांवरच अवलंबून रहावे लागते.देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्याच्या जंगलव्याप्त क्षेत्रात रूग्णालये आहेत. परंतु अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अप्रिशिक्षित खासगी डॉक्टरांना देवच पावतो. सुरू वित्तीय वर्षात तीन महिन्यांत चार जणांना हिवतापामुळे प्राणास मुकावे लागले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांत नागरिकांना हिवताप व डेंग्यू आजारांनी ग्रासले. मागील वर्षी पावसाळ्यात अनेक गावांत संक्रमक आजार पसरले होते. वेळेवरच झोपेतून जागे होणारा आरोग्य विभाग काय कामाचा. हिवताप नियंत्रित करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने या विभागास फवारणी, संक्रमक आजारांवर नियंत्रण, रक्ताच्या नमूण्यांची तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु प्रामुख्याने गाव स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाची उद्दिष्टपूर्ती होत नाही. (प्रतिनिधी)हिवताप निर्मूलनावर प्रश्नचिन्हजिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमितरित्या ९८ आरोग्य सेवकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५७ पद आजही रिक्तच आहेत. तसेच १६ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांचे पद रिक्त आहेत. ३१ मार्च २०१४ पासून निधी नसल्याचे कारण सांगून ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. त्यामुळे संक्रामक आजार व हिवतापाचे निर्मूलन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.फवारणीच्या औषधांची समस्याजिल्हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून या क्षेत्रात फवारणी करण्यासाठी ‘अल्फ्रामेथिन’ व इतर पॉवडर दुसऱ्याच जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात साठवण करून योग्य वेळी औषध रवाना केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.