शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कसे मिळविणार हिवतापावर नियंत्रण?

By admin | Updated: June 18, 2015 00:49 IST

पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय ...

५७ पदे रिक्त : कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन प्रलंबितगोंदिया : पावसाळ्याच्या दिवसांत विविध आजार पसरतात. त्यांना नियंत्रित करण्यात आरोग्य व जिल्हा हिवताप कार्यालय अपयशी ठरत आहे. अनेक रूग्णांचा बळी जातो. त्यातच जिल्हा आरोग्य विभागात मंजूर नियमित ९८ पैकी ५७ पद रिक्त आहेत. तसेच मंजूर १६ कंत्राटी आरोग्य सेवकांचे मानधन निधी नसल्यामुळे प्रलंबित आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित होते आहे.देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या तालुक्यांमध्ये पावसाळ्यात अनेक संक्रामक आजार पसरतात. मात्र कोट्यवधी रूपये खर्चून जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रचार करणाऱ्या आरोग्य विभागाला रिक्त पदांमुळे मृतकांची संख्या सांगण्यात काहीच गैर वाटत नाही. ग्रामीण व शहरी क्षेत्रात आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. सर्व नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागील हेतू होता. आरोग्य उपकेंद्र ते जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रूग्णालय ते जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय सर्वांनाच कोट्यवधी रूपये खर्च करण्याची सूट दिली आहे. परंतु हा निधी केवळ खरेदी व बांधकाम कार्यावरच खर्च होते. खरे पाहता सामान्य नागरिकांना आतासुद्धा खासगी डॉक्टरांवरच अवलंबून रहावे लागते.देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्याच्या जंगलव्याप्त क्षेत्रात रूग्णालये आहेत. परंतु अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अप्रिशिक्षित खासगी डॉक्टरांना देवच पावतो. सुरू वित्तीय वर्षात तीन महिन्यांत चार जणांना हिवतापामुळे प्राणास मुकावे लागले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील विहीरगाव, केशोरी आदी गावांत नागरिकांना हिवताप व डेंग्यू आजारांनी ग्रासले. मागील वर्षी पावसाळ्यात अनेक गावांत संक्रमक आजार पसरले होते. वेळेवरच झोपेतून जागे होणारा आरोग्य विभाग काय कामाचा. हिवताप नियंत्रित करण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने या विभागास फवारणी, संक्रमक आजारांवर नियंत्रण, रक्ताच्या नमूण्यांची तपासणी आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु प्रामुख्याने गाव स्तरावर कार्य करणाऱ्या आरोग्य सेवकांचे पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाची उद्दिष्टपूर्ती होत नाही. (प्रतिनिधी)हिवताप निर्मूलनावर प्रश्नचिन्हजिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाला नियमितरित्या ९८ आरोग्य सेवकांच्या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ५७ पद आजही रिक्तच आहेत. तसेच १६ कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांचे पद रिक्त आहेत. ३१ मार्च २०१४ पासून निधी नसल्याचे कारण सांगून ही पदे अद्याप भरण्यात आली नाहीत. त्यामुळे संक्रामक आजार व हिवतापाचे निर्मूलन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.फवारणीच्या औषधांची समस्याजिल्हा आदिवासीबहुल आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून या क्षेत्रात फवारणी करण्यासाठी ‘अल्फ्रामेथिन’ व इतर पॉवडर दुसऱ्याच जिल्ह्यात पाठविण्यात येत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात साठवण करून योग्य वेळी औषध रवाना केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.