शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

५० हजारात शेततळी कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 01:46 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजना, गतिमान पाणलोट योजना, आरएजीपी (अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी), आयडब्ल्युएमपी एकात्मिक ...

शेतकऱ्यांमध्ये संताप : अनुदान वाढवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरजयुवराज गोमासे भंडाराराष्ट्रीय कृषी विकास योजना, गतिमान पाणलोट योजना, आरएजीपी (अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी), आयडब्ल्युएमपी एकात्मिक पाणलोट विकास योजना १०० टक्के अनुदान योजनेत मशीनचा वापर करून शेततळे खोदण्यासाठी ८२ हजार व १.११ लाख रूपयांचे अनुदान दिले जायचे. आता मंत्रिमंडळाने ‘मागे त्याला शेततळे’ या योजनेत ५० हजाराचे अनुदान जाहीर केल्यामुळे हे अनुदान अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागली आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर यांत्रिकी पद्धतीने दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत उत्पन्नासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. भाजीपाला, बागायती पिके व अन्न धान्याची पिके यातून घेतली जात आहे. परंतु अजुनही अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी नाहीत. सिंचनाच्या शाश्वत सुविधा नाहीत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. गतिमान पाणलोट योजना, आरएडीपी अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी, आयडब्ल्यूएमी एकात्मिक पाणलोट विकास योजना शासनाच्यावतीने पूर्वीपासून राबविल्या जात आहेत. या योजना १०० टक्के अनुदानाच्या असून सर्व खोदकाम मशीनने करावयाची आहेत. या योजनांतर्गत ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यांसाठी १ लाख ११ हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत दिले जाते. योजनांना प्रतिसादही समाधानकारक आहे. रोजगार हमी योजने मार्फतही १०० टक्के अनुदानावर ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी सुमारे १.५० लाखाचे अनुदान दिले जाते. यात १ मीटरपर्यंतचे काम मजुरांच्या सहायाने तर उर्वरित काम मशीनच्या मदतीने करावयाचे असून हे या योजनेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र अनुदानाची रक्कम मोठी असल्याने या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत.शेततळ्यांसाठी ऐवढ्या योजना असताना शासन मागेल त्याला शेततळे नावाची नवीन योजना कार्यान्वित केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देऊन आॅनलाईन घोषित केली आहे. १९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अर्ज मागविले जात आहे. मात्र ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवी असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ‘आवळा देऊन कोहळा घेणे’ यासारखी ही योजना असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अज्ञानी शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कुठे भटकणार? जुन्या योजना बंद होणार तर नाही, अशी शंका घेतली जात आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत शेततळ्याची कामे मशीनने करावयाची असली तरी ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावात योजना राबविणारी जाणार असताना मिळणारा निधी तुटपूंजा असल्याने दुष्काळात तोंडाला पाने पुसण्यासारखी योजना असल्याचा आरोप होत आहे. ५० हजारापेक्षा जास्त खर्च आल्यास लाभार्थ्याला द्यावा लागणार असून बीपीएल व आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांनी पैसा आणायचा कुठून, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.